शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तीन मुलांची हत्या करून वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 15:23 IST

अकोला - बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोतर्डी येथील एका इसमाने त्याच्या तीन मुलांची निर्दयतेने हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविष्णू दशरथ इंगळे असे या निर्दयी बापाचे नाव असून, तो गंभीर जखमी झाला आहे. दोन मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने शिवानी नामक १५ वर्षीय चिमुकल्या मुलीला विष पाजले. तीनही मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने स्वत:ला विजेचे धक्के दिले; मात्र त्रास सहनशक्तीपलीकडे असल्याने त्याने नंतर गळफास घेतला.

अकोला - बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोतर्डी येथील एका इसमाने त्याच्या तीन मुलांची निर्दयतेने हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू दशरथ इंगळे असे या निर्दयी बापाचे नाव असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती दिल्यानंतरही बोरगाव मंजु पोलीस तब्बल दोन ते अडीच तास घटनास्थळावर न पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

धोतर्डी येथील रहिवासी विष्णू दशरथ इंगळे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्या पत्नीचे गत दोन वर्षांपूर्वीच निधन झाल्यानंतर विष्णू इंगळे हे मोलमजुरी करून मुलांचा उदरनिर्वाह करीत होते; मात्र बुधवारी रात्री त्यांनी अचानक तीनही मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये विष्णू इंगळे यांचा मोठा मुलगा अजय विष्णू इंगळे याला विष पाजले, त्यानंतर त्याला विजेचे धक्के दिले; मात्र एवढे केल्यावरही १७ वर्षीय अजयचा मृत्यू न झाल्याने त्याच्या डोक्यात वरवंटा मारुन त्याची हत्या केली, त्यानंतर १६ वर्षीय मनोज विष्णू इंगळे याला विष पाजले; मात्र त्याचा जीव गेला की नाही, हा संशय आल्याने त्यालाही विजेचे धक्के दिल्यानंतर मनोजचा मृत्यू झाला. दोन मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने शिवानी नामक १५ वर्षीय चिमुकल्या मुलीला विष पाजले. त्यानंतर तिलाही विजेचे धक्के देऊन तिची हत्या केली. तीनही मुलांची हत्या केल्यानंतर विष्णू इंगळे याने स्वत:ला विजेचे धक्के दिले; मात्र त्रास सहनशक्तीपलीकडे असल्याने त्याने नंतर गळफास घेतला; मात्र गळफास घेण्यात यशस्वी न झाल्याने त्याने स्वत:च्या शरीरावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, यामध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर तो घरातच कोसळला, तीन मुलांचे मृतदेह घरात पडलेले होते, तर विष्णू इंगळे हा मरणाच्या उंबरठ्यावर असताना या घटनेची माहिती बोरगाव मंजु पोलिसांना देण्यात आली, तसेच १०८ या रुग्णवाहिकेलाही ८ वाजताच्या सुमारास माहिती देण्यात आली; मात्र रात्री १० वाजेपर्यंत बोरगाव मंजु पोलीस घटनास्थळावर दाखल झाले नाही. रुग्णवाहिकाही १० वाजेपर्यंत न आल्याने विष्णू इंगळे हा उपचारासाठी तडफडत होता. यासंदर्भात बोरगाव मंजु पोलिसांशी संपर्क साधला असता, प्रभारी ठाणेदार वैभव पाटील यांना घटनेची माहितीही नसल्याचे समोर आल्याने अकोला पोलीस एवढ्या गंभीर घटनेनंतरही झोपेचे सोंग घेऊन असल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून