शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वऱ्हाडात  फळ पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:18 IST

अकोला : मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

अकोला : विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम आता फळ पिकांवर होत असून, फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठासह शेतकºयांना आटापिटा करावा लागत आहे. मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५० टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास अगोदरच प्रतिबंध घातला होता. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकºयांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.विदर्भात संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर क्षेत्र आहे; परंतु पूरक पाऊस न झाल्याने वातावरणात आर्द्रता नाही. तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९० हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १० हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळ पिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळ पिकांबाबत महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५० फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३०० ते ३५० फूट खोल जाऊनही लागत नसल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले.यावर्षीच्या उन्हाळ््यात आतापासूनच तापमान प्रचंड वाढल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- पावसाचे दिवस कमी झाले असून, भूगर्भातील पातळी खोल गेली आहे. त्याचे हे परिणाम आहेत आता पाण्याची बचत करावी लागणार असून, भूगर्भात जलसाठा साठविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपचार करावे लागणार आहेत.- डॉ. सुभाष टाले,विभागप्रमुख, मृद व जल संधारण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ