शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वऱ्हाडात  फळ पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 19:18 IST

अकोला : मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

अकोला : विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम आता फळ पिकांवर होत असून, फळबागा वाचविण्यासाठी कृषी विद्यापीठासह शेतकºयांना आटापिटा करावा लागत आहे. मागील महिन्यात विदर्भात काही भागात गारपीट झाल्याने फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्यावर गेल्याने शेतकºयांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५० टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास अगोदरच प्रतिबंध घातला होता. पश्चिम विदर्भातील सर्वच धरणांमधील जलपातळी आजमितीस सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकºयांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.विदर्भात संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर क्षेत्र आहे; परंतु पूरक पाऊस न झाल्याने वातावरणात आर्द्रता नाही. तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९० हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १० हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळ पिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळ पिकांबाबत महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५० फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३०० ते ३५० फूट खोल जाऊनही लागत नसल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले.यावर्षीच्या उन्हाळ््यात आतापासूनच तापमान प्रचंड वाढल्याने पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- पावसाचे दिवस कमी झाले असून, भूगर्भातील पातळी खोल गेली आहे. त्याचे हे परिणाम आहेत आता पाण्याची बचत करावी लागणार असून, भूगर्भात जलसाठा साठविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने उपचार करावे लागणार आहेत.- डॉ. सुभाष टाले,विभागप्रमुख, मृद व जल संधारण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ