संग्रामपूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: January 2, 2015 00:38 IST2015-01-02T00:38:48+5:302015-01-02T00:38:48+5:30

नववर्षाच्या पुर्वसंध्येलाच मरणाला कवटाळले.

The farmer's suicide in Sangrampur taluka | संग्रामपूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या

संग्रामपूर तालुक्यातील शेतक-याची आत्महत्या

संग्रामपूर (जि. बुलडाणा): ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना, संग्रामपूर तालुक्यातील एका शेतकर्‍याने मात्र नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून वीष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. आवार येथील राजेंद्र अंबादास अवचार (वय ४0) यांनी ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घरातील सर्वजण झोपेत असताना विष प्राशन केले. कुटुंबातील सदस्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पहाटे त्यांना शेगाव येथे उपचारार्थ आणले; मात्र तोपर्यंंत उशीर झाला होता. राजेंद्र अवचार यांच्यावर को-ऑपरेटीव्ह बँकेचे कर्ज असून, या कर्जाची परतफेड झाली नसल्याने दुसरी बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती.

Web Title: The farmer's suicide in Sangrampur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.