शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

कोवळ्या पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:51 IST

Farmers stay up all night to protect their crops : कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे.

- रवी दामोदर

अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. सध्या शेतकऱ्यांनी पेरलेली पिके शेतात डोलू लागली आहेत. या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे. पिके पावसाअभावी व वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने डोलणाऱ्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच जिल्ह्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता कोवळ्या पिकांकडे वळविला असून, शेतकरी आता तिहेरी संकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पुढील आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. (फोटो)

 

पाऊसही रुसला!

येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ आली, तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सध्या जी पिके शेतात उगवली आहेत त्या पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ते शेतकरी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देत आहेत. जर पाऊस लांबला, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.

 

 

रात्रीस खेळ चाले!

दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाही. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळपचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा जी धोक्यात टाकून रात्रीच्या सुमारास जागल करून पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.

---------------------

दररोज ढग येतात दाटून!

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी करून उगवलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाऊस मात्र गायब झाला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात. सकाळी पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, तर सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

 

जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत असल्याने रात्रभर जागल करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- ऋषिकेश घोगरे, शेतकरी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी