शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

कोवळ्या पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची रात्रभर जागल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:51 IST

Farmers stay up all night to protect their crops : कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे.

- रवी दामोदर

अकोला: शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका संपत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना विषाणू, तर दुसरीकडे अस्मानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी दुहेरी संकटात असतानाच शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने चांगली सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. सध्या शेतकऱ्यांनी पेरलेली पिके शेतात डोलू लागली आहेत. या कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी ताव मारत असून, पीक फस्त करीत असल्याचे चित्र आहे. पिके पावसाअभावी व वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर जागल करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने डोलणाऱ्या पिकांनी पावसाअभावी माना टाकल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशातच जिल्ह्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता कोवळ्या पिकांकडे वळविला असून, शेतकरी आता तिहेरी संकटात सापडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. पुढील आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. (फोटो)

 

पाऊसही रुसला!

येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ आली, तर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. सध्या जी पिके शेतात उगवली आहेत त्या पिकांना पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, ते शेतकरी स्प्रिंक्लरद्वारे पाणी देत आहेत. जर पाऊस लांबला, तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही.

 

 

रात्रीस खेळ चाले!

दिवसा बहुतांश शेतकरी शेतात असल्याने वन्य प्राणी शेतात येत नाही. परंतु रात्रीच्या सुमारास हरीण, रानडुकरांचे कळपचे कळप उगवलेल्या पिकांवर ताव मारीत आहेत. त्यामुळे शेतकरी स्वत:चा जी धोक्यात टाकून रात्रीच्या सुमारास जागल करून पिकांचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.

---------------------

दररोज ढग येतात दाटून!

मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी करून उगवलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत असताना पाऊस मात्र गायब झाला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात. सकाळी पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, तर सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

 

जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्य प्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत असल्याने रात्रभर जागल करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- ऋषिकेश घोगरे, शेतकरी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी