पीआरसीच्या पथकाला शेतकऱ्यांनी विचारला जाब!
By Admin | Updated: June 3, 2017 01:42 IST2017-06-03T01:42:06+5:302017-06-03T01:42:06+5:30
कान्हेरी गवळी येथे घातला घेराव

पीआरसीच्या पथकाला शेतकऱ्यांनी विचारला जाब!
बाळापूर : अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या पथकाला बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथे शेतकऱ्यांनी शुक्रवारी घेराव घातला, तसेच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांविषयी जाब विचारला.
कान्हेरी गवळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करण्यासाठी पंचायत राज समितीने २ जून रोजी कान्हेरी गवळी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान काही शेतकऱ्यांना घेराव घालून; साहेब, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर इतर विषयांकडे वळा,असा आग्रह केला.
यावेळी पथकाने मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पीआरसीच्या पथकाने बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे आणि कान्हेरी गवळीचे ग्रामसेवक जी.के.धाडसे वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.