शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

 मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला; पेरणीबाबत संभ्रम, बियाणे बाजारात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 13:57 IST

अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.

ठळक मुद्देमहाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मात्र यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज बाधून नियोजन केले आहे.महाबीजच्या या बियाण्यांसह १० लाख ५० हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले. आतापर्यंतच्या प्रघातानुसार १५ मेनंतर बाजारात बियाणे खरेदीची लगबग सुरू होते; पण अद्याप शेतकरी बियाणे बाजारात फिरकला नाही.

अकोला: मान्सूनची अनुकूल वाटचाल सुरू असून, भारतीय हवामान शास्त्र विभागासह वेगवेगळ््या खासगी हवामान शास्त्र संस्थांतर्फे वेळेवर आगमन होण्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे. त्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने शेतकरी सुखावला; पण बियाणे कोणते पेरावे याबाबत संभ्रम असल्याने बियाणे बाजारात शुकशुकाट आहे. हे चित्र विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आहे.राज्यात मागच्यावर्षी १ कोटी ४९ लाख हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी ८० लाख हेक्टर म्हणजे ६० टक्के क्षेत्र सोयाबीन व कापसाचे होते. १० टक्के कापसाचे क्षेत्र वाढल्याने ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी झाली होती. सोयाबीन क्षेत्र ३८ लाखावर गेले होते; पण मागच्या वर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान झाले तर कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. मूग, उडीद पीकही हातचे गेल्याने यावर्षी कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. कृषी विभाग व महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मात्र यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज बाधून नियोजन केले आहे. महाबीजने ४ लाख ३० हजार क्विंटल बियाणे बाजारात आणले आहे. तसेच महाबीजच्या या बियाण्यांसह १० लाख ५० हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले. कृषी आयुक्तालयाच्यावतीने यावर्षी ३७५ कापसाच्या हायब्रीड वाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे. महाबीजने इतर वाणांसह तृणधान्य १ लाख ४ हजार २७९ क्विंटल, कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल व इतर १,३४२ क्विंटल बियाणे मिळून ५ लाख १६ हजार ३२ क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून,९० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध करू न देण्यात आले. खासगी कंपन्यांचे हे बियाणे बाजारात आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या प्रघातानुसार १५ मेनंतर बाजारात बियाणे खरेदीची लगबग सुरू होते; पण अद्याप शेतकरी बियाणे बाजारात फिरकला नाही. 

मान्सूनपूर्व कापसाचे क्षेत्र घटले !मागच्यावर्षी बोंडअळीने कापसाचे प्रचंड नुकसान केल्याने यावर्षी बीटी कापसाचे बियाने २० मेपर्यंत विक्रीवर शासनाने प्रतिबंध घातला होता. मान्सूनपर्व किंवा धूळपेरणी ही १५ ते ३० मेपर्यंत केली जाते; पण त्या काळात बियाणेच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. तसेच पाणीही उपलब्ध नसल्याचा परिणाम या पेरणीवर झाला. 

यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले असून, मान्सूनपूर्व पावसाने शेतकरी सुखावला. त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करीत आहेत. आणखी एखादा चांगला पाऊस पडल्यास बियाणे खरेदीसाठी गर्दी होईल. शेतकºयांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी.ओमप्रकाश देशमुख,व्यवस्थापकीय संचालक,महाबीज, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी