शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मदतीची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:56 IST

दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळी दुष्टचक्राच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.

- संतोष येलकरअकोला : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारकडून मंगळवारी करण्यात आली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या; मात्र दुष्काळी दुष्टचक्राच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदतीची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची आस आता दुष्काळी तालुक्यांतील शेतकºयांना लागली आहे.राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असून, उपाययोजनांना सुरुवात होणार असल्याची घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये टंचाई निवारणासाठी सरकारमार्फत जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज देयकात सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात टँकरद्वारे पाणी पुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील शेतकºयांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये संकटात सापडलेल्या शेतकºयांसाठी मदत मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही. पावसातील खंड, भूजल पातळी,जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाण कमी आणि त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याच्या पृष्ठभूमीवर, पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून मदत केव्हा जाहीर होणार, याबाबतची प्रतीक्षा संकटात सापडलेल्या शेतकºयांकडून केली जात आहे.अमरावती विभागातील दुष्काळसदृश असे आहेत २७ तालुके!सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या १८० तालुक्यांमध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील २७ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा : अकोला, बाळापूर, तेल्हारा, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर. अमरावती जिल्हा : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी. बुलडाणा जिल्हा : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, मोताळा, सिंदखेड राजा. वाशिम जिल्हा : रिसोड. यवतमाळ जिल्हा : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, मारेगाव, राळेगाव, उमरखेड व यवतमाळ इत्यादी तालुक्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळ