शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शेतकऱ्यांना आता रेल्वेने पाठवता येणार फळे-भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:46 IST

यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देखर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

अकोला : शेतकऱ्यांच्या फळे, भाजीपाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून कृषी विभागाने नवीन उपक्रम हाती घेतला असून, शेतकरी व व्यापाºयांना भाजीपाला, फळे आता बाहेरगावी पाठवता येणार आहेत. त्यासाठी रेल्वेची रॅक उपलब्ध होणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २३ मार्च मध्यरात्रीपासून देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक बंद आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून, परराज्यात शेतमाल पाठविणे बंद झाले आहे. शेतकºयांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. शेतकºयांना फळे व भाजीपाला इतर राज्यात पाठवायचा असल्यास तो आता पाठवता येणार आहे. व्यापाºयांनाही फळे, भाजीपाला पाठवता येणार आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी बचत गट, व्यापाºयांना रेल्वेकडे नोंदणी करावी लागणार आहे. शेतमाल पोहोचवण्यासाठी लागणारा खर्च इतर रेल्वेच्या काही कागदांची पूर्तता करावी लागणार आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर फळे, फुले व इतर भाजीपाला दरवर्षी इतर राज्यात पाठविण्यात येतो. विदर्भातून संत्रा, खान्देशातून केळी, नाशिक, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, पपई यासह इतर फळे, भाजीपालादेखील पाठवला जातो. अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कागदी लिंबू हा इतर राज्यात पाठविण्यात येतो; परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोड वाहतूक बंद असल्याने शेतकºयांचा माल तसाच पडून आहे. त्यामुळे शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होत आहे. हे टाळण्यासाठी शेतकºयांना ही दिलासादायक बातमी कृषी विभागाने दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती १३८ या क्रमांकावर शेतकºयांना उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीrailwayरेल्वे