शेतकरी पीककर्जापासून वंचित, पेरणीच्या तोंडावर बुरे दिन
By Admin | Updated: June 15, 2015 01:56 IST2015-06-15T01:56:35+5:302015-06-15T01:56:35+5:30
शेतकरी व शेतकरी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया.

शेतकरी पीककर्जापासून वंचित, पेरणीच्या तोंडावर बुरे दिन
अकोला: भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी 'अच्छे दिन आने वाले है'चा नारा दिला आणि प्रचारादरम्यान शेतकर्यांना पीककर्ज माफी, सातबारा कोरा, शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या ५0 टक्के अधिक भाववाढ देऊ, जुन्या पीककर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पीककर्ज देऊ, अशी आश्वासनं दिली. मॉन्सून आला. पेरण्या तोंडावर आल्या असतानाही शासनाने एकही मागणी पूर्ण केली नाही. शेतकर्यांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्या भाजप सरकारने शेतकर्यांवर बुरे दिनची वेळ आणली आहे. अपुर्या निधीमुळे पीककर्ज पुनर्गठनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अद्यापही हजारो शेतकरी खरीप पीककर्जापासून वंचित आहेत. शासनाने पीककर्ज पुनर्गठनाच्या भानगडीत न पडता, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जिल्हय़ातील शेतकरी व शेतकरी नेत्यांनी केली आहे. शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा न केल्यास जिल्हय़ातील हतबल झालेल्या शेतकर्यांना संघटित करून शासनाविरोधात तीव्र लढा उभारू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला आहे.