शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

अकोट-पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार दुष्काळी मदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:16 IST

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.

- संतोष येलकरअकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळी मदत देण्यात आली असून, आता या तालुक्यांव्यतिरक्त दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांतील शेतकºयांनाही पीक पैसेवारीचा निकष लावून पीक नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ७ जून रोजी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.गत २३ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर इत्यादी पाच तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी मदत वाटपासाठी शासनामार्फत गत २५ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्यातील ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याचा निर्णय गत २१ फेबु्रवारी रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमध्येही दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना आधीच पीक नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात आली असूून, त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त ज्या गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, त्या गावांतील शेतकºयांना पीक पैसेवारीचा निकष लावून पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळी मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जून रोजी जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या अकोट व पातूर या दोन तालुक्यांतील २६१ गावांमधील शेतकºयांनाही दुष्काळी मदत मिळणार आहे.दोन तालुक्यांत अशी आहेत दुष्काळग्रस्त गावे!तालुका           गावेअकोट            १६७पातूर               ९४....................................एकूण            २६१शासन निर्णयाची प्रतीक्षा!राज्यातील दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांतील शेतकºयांना आधीच पीक नुकसान भरपाईपोटी मदत देण्यात आली असून, त्यानंतर या तालुक्यांव्यतिरिक्त दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमधील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले; मात्र यासंदर्भात आता शासन निर्णय जिल्हा प्रशासनाकडे केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा करण्यात येत आहे.पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी

१३७ कोटींच्या मदतीचे वाटप!गत २३ आॅक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार, जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत गत फेबु्रवारीमध्ये प्राप्त झालेला १३७ कोटी ३१ लाख २४ हजार ५६२ रुपयांचा मदतनिधी शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला. संबंधित बँकांमार्फत मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोलाdroughtदुष्काळakotअकोटPaturपातूर