शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Published: November 11, 2015 1:52 AM

२५ हजार ८0१ शेतक-यांनी काढला होता विमा

सायखेड (अकोला): गतवर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी काढलेल्या विम्याचा लाभ जिल्ह्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पैसा कोठून आणावा आणि संसाराचा गाडा कसा हाकावा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विम्याचा लाभ मिळाला असता तर थोडीशी का होईना विवंचना कमी झाली असती, अशी भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांना शासनाच्या आर्थिक मदतीसह खरीप हंगामासाठी काढलेला पीक विमा मिळाला होता. शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी शेती तयार करून मागील दुष्काळाची झीज भरून काढण्यासाठी पेरणी केली; मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा रब्बी पिकांना फटका बसला. पिके काढणीला घेताच वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व इतर पिके भुईसपाट झाली. गतवर्षी रब्बी हंगामात अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांनी रब्बी पीक विमा काढून पिकाला संरक्षण दिले होते. यंदा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकली. त्यानंतर काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. त्यामुळे उत्पादन प्रचंड घटले. बहुतांश शेतकर्‍यांचा तर मशागत आणि पेरणीचा खर्चही निघालेला नाही; मात्र आता गतवर्षीचा रब्बी पीक विमा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. शासनाने तातडीने विमा मंजूर होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.