शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीएम-किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:13 IST

‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आपले सरकार सेवा केंद्रांवर (सीएससी) जिल्ह्यातील शेतकºयांची नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ आॅगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतकºयांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार प्रतिमाह कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार असून, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत गत १६ आॅगस्टपासून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांनी नोंदणी केली. नाव नोंदणीत शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद बघता, ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याची बाब समोर येत आहे.

विमा हप्ता रकमेचा अडसर!प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीनंतर लाभार्थी शेतकºयांनी प्रतिमाह विमा हप्त्याची रक्कम संंबंधित विमा कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. विमा हप्त्याची रक्कम भरल्यानंतर आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, त्यासाठी विमा हप्त्यापोटी भराव्या लागणाºया रकमेचा अडसर ठरत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी