शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पीएम-किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:13 IST

‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री किसान (पीएम-किसान) मानधन योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या अल्पभूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आपले सरकार सेवा केंद्रांवर (सीएससी) जिल्ह्यातील शेतकºयांची नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे.प्रधानमंत्री किसान मानधन योजना गत ९ आॅगस्टपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी या योजनेत सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत. योजनेंतर्गत पात्र शेतकºयांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर संबंधित शेतकºयांना लाभार्थी हिस्सा रकमेपोटी वयानुसार प्रतिमाह कमीत कमी ५० रुपये व जास्तीत जास्त २०० रुपये विमा हप्त्याची रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमा करावी लागणार असून, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांना प्रतिमाह ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानुषंगाने ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत गत १६ आॅगस्टपासून जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आली. नोंदणी सुरू होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र ५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४ हजार ७0८ शेतकºयांनी नोंदणी केली. नाव नोंदणीत शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद बघता, ‘पीएम-किसान’ मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीकडे शेतकºयांनी पाठ फिरविल्याची बाब समोर येत आहे.

विमा हप्ता रकमेचा अडसर!प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत नाव नोंदणीनंतर लाभार्थी शेतकºयांनी प्रतिमाह विमा हप्त्याची रक्कम संंबंधित विमा कंपनीकडे जमा करणे आवश्यक आहे. विमा हप्त्याची रक्कम भरल्यानंतर आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह ३ हजार रुपये ‘पेन्शन’ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, त्यासाठी विमा हप्त्यापोटी भराव्या लागणाºया रकमेचा अडसर ठरत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी