शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अकोला : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 17:46 IST

सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसखाराम गंगाराम बहाकार (५५) या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. सखाराम बहाकर याच्या नावाने चोहोगाव शेतशिवारात सव्वा एकर शेतजमीन असून त्यावर जिल्हा बँकेच्या धाबा शाखेचे पीककर्ज आहे.

सायखेड (जि. अकोला) : नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून चोहोगाव येथील सखाराम गंगाराम बहाकर या ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन केल्यामुळे १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विविध संकटाच्या चक्रव्युहात गुरफटून गेल्याने मागील महिनाभरात चोहोगावमधील तीन शेतकºयांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्यामुळे चोहोगाव हादरून गेले आहे.नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या सखाराम गंगाराम बहाकार (५५) या शेतकऱ्याने दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा १ मार्चच्या सकाळी ४ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. सखाराम बहाकार यांनी ‘बटाई’ पद्धतीने पेरलेल्या भाजीपाल्याच्या शेतातच दोन दिवसांपुर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. सखाराम बहाकर याच्या नावाने चोहोगाव शेतशिवारात सव्वा एकर शेतजमीन असून त्यावर जिल्हा बँकेच्या धाबा शाखेचे पीककर्ज आहे. यासह तीन मुलींच्या लग्नासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले खाजगी कर्जही आहे. चार वर्षापासून शेतात उत्पादन झाले नाही. शेती तोट्यात करण्याची वेळ आली. त्यामुळे बहाकर यांनी यंदा दुसºयाच्या शेतात बटाईने भाजीपाला पेरला होता. त्यांचा मुलगा शाळेतून आल्यावर गावात भाजीपाला विकायचा. इतकेच नव्हे तर शेतातून रखवाली करून घरी आल्यावर सखारामही सकाळी व सायंकाळी भाजीपाला विकायचा. तथापि , कवडीमोल भावामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या चिंतेतच सखाराम बहाकर यांनी शेतातच कीटकनाशक घेतले.

२५ एप्रिलला ठरले रुपालीचे लग्नसखाराम बहाकर यांची मुलगी रुपालीचे २५ एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. लग्न घरीच असल्यामुळे त्याचे नियोजन व इतर खर्चाची जुळवाजुळव कशी करावी, याची चिंतासुद्धा त्यांना लागली होती. यापूर्वी तीन मुलींची लग्ने केली. त्याचे कर्ज अजूनही फिटली नाहीत. तोच शेवटच्या मुलीचे लग्न बार्शीटाकळी तालुक्यातील वस्तापूर (वाघा) येथील छगन उत्तम येवले यांच्यासोबत ठरले आहे. आता सखाराम यांच्या मृत्युमुळे या लग्नाची जबाबदारी पत्नी व एकुलत्या एक मुलावर आहे.

चार वर्षापूर्वी भावानेही केली होती आत्महत्याचार वर्षापूर्वी सखाराम बहाकर यांचे भाऊ गजानन गंगाराम बहाकर या अल्पभूधारक शेतकऱ्यानेसुद्धा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती.

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीFarmerशेतकरीSuicideआत्महत्या