शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अकोला व वाशिम जिल्ह्यातील २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३२०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:47 IST

अकोला व वाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देसंबंधित शेतकºयांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. याद्यांची तपासणी करून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००९ पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोलावाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सन २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय गतवर्षी जूनमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यानंतर कर्जमाफी योजनेच्या विस्तारात सन २००८ मध्ये केंद्र शासनाच्या कर्जमाफी योजनेत आणि सन २००९ मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्र्जमाफी योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांंना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ९ मे २०१८ रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार सन २००९ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकºयांपैकी १ आॅगस्टपर्यंत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या संबंधित शेतकºयांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या. याद्यांची तपासणी करून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.सन २००८ व २००९ च्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकºयांना कर्जमाफी मिळाला नाही, अशा सन २००१ ते २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यंत अकोला व वाशिम जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या ३ हजार २०० शेतकºयांच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, संबंधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमFarmerशेतकरी