शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अकोला जिल्ह्यातील भाजीपाला होणार निर्यात; शेतकरी-निर्यातदार कंपनीत करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:29 IST

अकोला : दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक आणि नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये सोमवारी भाजीपाला निर्यात करार झाला. करारानुसार जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे.

ठळक मुद्देभेंडी, कारले, दुधी भोपळा, मिरचीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दर्जेदार भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकवलेला भाजीपाला आता निर्यात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत निर्यातक्षम भाजीपाला उत्पादक आणि नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये सोमवारी भाजीपाला निर्यात करार झाला. करारानुसार जिल्ह्यातील शेतकºयांनी पिकवलेला भाजीपाला प्रामुख्याने भेंडी, कारले, दूधीभोपळा आणि मिरची निर्यात होणार आहे. भेंडी निर्यातीच्या दृष्टीने करार संपन्न झाला. ५५ शेतकºयांनी नोंदणी केली असून, साधारणत: ५० एकरात ही निर्यातक्षम भेंडी पिकवणार आहेत. या भेंडीला कंपनीकडून सरासरी २२ रुपये किलोचा दर निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातून दररोज २५ क्विंटल भेंडी निर्यात होईल. निर्यातक्षम भेंडी पिकवण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार कंपनी तांत्रिक मार्गदर्शन व निविष्ठा पुरविणार आहे. लोकशाही सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसीलदार रवी काळे, रामेश्वर पुरी, कृषी तज्ज्ञ निवृत्ती पाटील, ईवा कंपनीचे संचालक संदेश धुमाळ, अ‍ॅग्रो स्टारचे अजय क्षीरसागर यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

शेतकºयांना मोठी संधी - जिल्हाधिकारीभाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकºयांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जिल्ह्यातील शेतकरी मागे राहू नये, त्यांचा माल परदेशात निर्यात होऊन त्यांना भरघोस नफा मिळावा, या करिता जिल्हा प्रशासन व अपेडा यांनी शेतकºयांना भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा शेतकºयांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यात आपल्या जिल्ह्यातूनही निर्यातदार तयार व्हावेत, अशी अपेक्षाही यावेळी जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली.

५०० तरुण शेतकºयांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार! स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाºया जिल्ह्यातील ५०० तरुण शेतकºयांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, उत्तम मार्केट मिळावे व मालाचे ब्रॅण्डिंग व्हावे. तसेच शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाकरिता आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना ‘वावर’ नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरिता त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करावी, असे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Akolaअकोलाvegetableभाज्या