माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:21+5:302021-07-17T04:15:21+5:30
दरवर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गाव-खेड्यात वेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि ...

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!
दरवर्षी आषाढ आणि श्रावण महिन्यात सणानिमित्त नवविवाहितांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गाव-खेड्यात वेगळ्या प्रकारचा आनंद, जल्लोष आणि विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यामध्ये सुख-दुःखाच्या गोष्टी होतात. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी कोरोना निर्बंधामुळे यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विवाहितेला माहेरी जाण्यासाठी ओढ लागली आहे. परंतु कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून बहुतांश नवविवाहितांना आपल्या माहेरी जाता आले नाही. निर्बंध शिथिल झाल्याने काही महिला माहेरी जात आहे; परंतु अद्याप कोरोनाचा धोका न टळल्याने काही नवविवाहितांना जाणे शक्य होत नाही. हा कोरोना लवकर जावो, अशी प्रार्थना अनेकजणी करीत आहेत.
कोरोनाकाळात विवाहांची नोंद
२०२०-२०२१ २७३
नवविवाहितांच्या भावना
माहेरला जाण्याची लागली ओढ
लग्न झाल्यानंतर माहेरला जाण्याची ओढ लागली आहे; परंतु यावर्षी कोरोनामुळे आषाढ सणाचा उत्सव साजरा करता येणार नाही व माहेरी जाता येणार नाही.
- संध्या भोंगाडे, नवविवाहिता
खबरदारी म्हणून टाळते!
गत दीड वर्षापासून कोरोनामुळे माहेरी जाण्यासाठी अडचणी येत आहे. निर्बंंध असल्याने जाणे शक्य होत नाही. तसेच विदेशात राहात असल्याने आणखी अडचणी वाढल्या. मात्र, कोराेनामुळे खबरदारी म्हणून माहेरी जाणे टाळत आहे.
- प्रियंका तिनखेडे, नवविवाहिता
नवविवाहितांच्या आईची भावना
काळजी म्हणून बोलावत नाही!
मुलीचा आषाढ सण आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आम्ही मुलीला बोलावले नाही. तरी फोनवर बोलून समाधान होते.
- प्राजक्ती बहाड
निर्बंध शिथिल होण्याची अपेक्षा
कोरोनामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर जाण्यासाठी प्रार्थना करत आहे. निर्बंध लवकर शिथिल होण्याची अपेक्षा आहे.
- निर्मला कोकाटे