शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कोरोनाचा उद्रेक; दहा दिवसांत २६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ...

बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढत असून, तालुक्यात गत दहा दिवसांत २६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक होत असताना या वाहनचालकांवर अद्याप कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रवासी विनामास्क प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळेच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कडक कारवाई होत नसल्याने वाहनधारक बिनधास्त अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

----------------------------------

११ वाजेनंतरही दुकानांमध्ये गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शहरातील अत्यावश्यक सुविधा असलेली दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही ११ वाजेनंतरही काही दुकाने सुरूच राहत असून, दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पोलीस दुकाने बंद करण्यासाठी ११ वाजता फेरफटका मारतात. पोलीस निघून गेल्यानंतर दुकाने पुन्हा सुरूच राहत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------

ग्रामीण भागात मृत्यूंची संख्या अधिक

गेल्या तीन महिन्यांत शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

------------------------------

अवैध प्रवासी वाहतूक फोफावली!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद असल्याने याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रवासी विनामास्क प्रवास करीत असताना दिसून येत आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून जादा दराने भाडे वसूल करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.