शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कोरोनाचा उद्रेक; दहा दिवसांत २६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST

बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ...

बाळापूर : तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, गत तीन महिन्यांमध्ये ५४ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वेगाने वाढत असून, तालुक्यात गत दहा दिवसांत २६२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक होत असताना या वाहनचालकांवर अद्याप कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रवासी विनामास्क प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळेच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग हा वेगाने वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना प्रशासनामार्फत कडक कारवाई होत नसल्याने वाहनधारक बिनधास्त अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

----------------------------------

११ वाजेनंतरही दुकानांमध्ये गर्दी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शहरातील अत्यावश्यक सुविधा असलेली दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही ११ वाजेनंतरही काही दुकाने सुरूच राहत असून, दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पोलीस दुकाने बंद करण्यासाठी ११ वाजता फेरफटका मारतात. पोलीस निघून गेल्यानंतर दुकाने पुन्हा सुरूच राहत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------

ग्रामीण भागात मृत्यूंची संख्या अधिक

गेल्या तीन महिन्यांत शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ४७ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

------------------------------

अवैध प्रवासी वाहतूक फोफावली!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद असल्याने याचा गैरफायदा अवैध प्रवासी वाहतूकदार घेत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रवासी विनामास्क प्रवास करीत असताना दिसून येत आहेत. तसेच अवैध प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून जादा दराने भाडे वसूल करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.