शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

तर उद्योजक देशोधडीला लागतील!

By admin | Updated: May 6, 2016 02:21 IST

औद्योगिक महामंडळाचा नियोजनशून्य कारभार: मोठे उद्योजक अनुत्सुक.

राम देशपांडे /अकोलादरवर्षी निर्माण होणार्‍या आवर्षणाच्या स्थितीवर मात करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने कुठल्याच कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील अर्धेअधिक उद्योग बंद पडले असून, तग धरून असलेले उर्वरित उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठय़ा प्रमाणात भागभांडवल गुंतविलेले उद्योजक देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मोठे उद्योग या भागात येण्यास अनुत्सुक असल्याचे मत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल व उपाध्यक्ष उन्मेष मालू यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील १ हजार १७५ उद्योगांपैकी ५९२ उद्योग गतकाळात पाण्याअभावी बंद पडले आहेत. दिवसाला किमान १५ हजार लिटर पाण्याची मागणी असलेल्या उर्वरित ६00 उद्योगांचा पाणीपुरवठा ७ हजार ५00 लिटरवर येऊन ठेपला असताना, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी अधिग्रहित विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला आहे. नियोजनशून्य अधिकार्‍यांनी तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आरंभला असल्याचा घणाघाती आरोप ह्यलोकमतह्णशी बोलताना अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला. या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले की, आजतागायत अनेकदा अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास औद्योगिक विकास महामंडळ असर्मथ ठरले आहे. महान धरणातील पाणी खांबोरा प्रकल्पात घेऊन ते उद्योगांना पुरविले जात होते; मात्र महान धरणातील पाणीसाठा आरक्षित करून थेट पाइप लाइनद्वारे तो एमआयडीला देता आला असता. ज्याप्रमाणे ७0 कि.मी. लांब असलेल्या अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा केला जातो, त्याचप्रमाणे वान प्रकल्पातील पाणी थेट पाइप लाइनद्वारे अकोल्यापर्यंत आणता आले असते. हे अंतर ७0 कि.मी. पेक्षाही कमी आहे.