शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

तर उद्योजक देशोधडीला लागतील!

By admin | Updated: May 6, 2016 02:21 IST

औद्योगिक महामंडळाचा नियोजनशून्य कारभार: मोठे उद्योजक अनुत्सुक.

राम देशपांडे /अकोलादरवर्षी निर्माण होणार्‍या आवर्षणाच्या स्थितीवर मात करण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने कुठल्याच कायमस्वरूपी उपाययोजना केलेल्या नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील अर्धेअधिक उद्योग बंद पडले असून, तग धरून असलेले उर्वरित उद्योग पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोठय़ा प्रमाणात भागभांडवल गुंतविलेले उद्योजक देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर मोठे उद्योग या भागात येण्यास अनुत्सुक असल्याचे मत अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल व उपाध्यक्ष उन्मेष मालू यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. अकोल्याच्या औद्योगिक परिसरातील १ हजार १७५ उद्योगांपैकी ५९२ उद्योग गतकाळात पाण्याअभावी बंद पडले आहेत. दिवसाला किमान १५ हजार लिटर पाण्याची मागणी असलेल्या उर्वरित ६00 उद्योगांचा पाणीपुरवठा ७ हजार ५00 लिटरवर येऊन ठेपला असताना, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी अधिग्रहित विहिरींवर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला आहे. नियोजनशून्य अधिकार्‍यांनी तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार आरंभला असल्याचा घणाघाती आरोप ह्यलोकमतह्णशी बोलताना अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केला. या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले की, आजतागायत अनेकदा अशी परिस्थिती अनेकदा निर्माण झाली; मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास औद्योगिक विकास महामंडळ असर्मथ ठरले आहे. महान धरणातील पाणी खांबोरा प्रकल्पात घेऊन ते उद्योगांना पुरविले जात होते; मात्र महान धरणातील पाणीसाठा आरक्षित करून थेट पाइप लाइनद्वारे तो एमआयडीला देता आला असता. ज्याप्रमाणे ७0 कि.मी. लांब असलेल्या अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा केला जातो, त्याचप्रमाणे वान प्रकल्पातील पाणी थेट पाइप लाइनद्वारे अकोल्यापर्यंत आणता आले असते. हे अंतर ७0 कि.मी. पेक्षाही कमी आहे.