शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:56 IST

अकोला: शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची होणारी छेडखानी, शोषण, शारीरिक अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची राहील, असे स्पष्ट करीत शाळांना त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याससुद्धा बजावले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात आभा शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत याचिका दाखल केली होती.त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होतेसुचनांचे पालन न केल्यास, शाळा, महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची होणारी छेडखानी, शोषण, शारीरिक अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची राहील, असे स्पष्ट करीत शाळांना त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याससुद्धा बजावले आहे. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राशिवाय शिक्षक, कर्मचाºयांची नियुक्ती करू नये, असेही शासनाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयात आभा शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही तुमची असल्याचे सांगत, त्यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग अ‍ॅपची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी सूचना फलक लावावेत. तक्रार पेटी, शाळेच्या आवारात, प्रवेशद्वारावर सीसी कॅमेरे बसवावेत, प्रवेशद्वाराजवळ महिला, पुरूष सुरक्षा रक्षक नेमावा. शाळेतील मुलांच्या उपस्थितीबाबत सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस हजेरी नोंदवावी आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती पालकांना द्यावी आणि खासगी वाहनाने येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित वाहनचालकाच्या पडताळणी करण्याच्या सूचना पालकांना द्याव्यात. तसेच स्कूल बस, आॅटोरिक्षामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बसू देऊ नये. विद्यार्थी, विद्यार्थ्यांना निवासस्थानापर्यंतच सोडावे आणि शेवटच्या मुलीला निवासस्थानी सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका, शिक्षिका सोबत असावी. नसेल तर तशी नियुक्ती करावी. मुला-मुलींचे, प्रसाधनगृह स्वतंत्र व पुरेशा अंतरावर असावेत. मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविका असाव्यात. शिक्षक, कर्मचाºयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे. विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक इजा पोहोचेल, अशी शिक्षा करू नये. मुलांचे पालक, नातेवाईक शाळेत येईपर्यंत त्यांचा ताबा महिला शिक्षिकेकडे द्यावा. विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओळखपत्र दाखविल्याशिवाय ताब्यात देऊ नये. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन, उपहारगृहासाठी नेमण्यात येणाºया कर्मचाºयांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नियुक्ती करू नये, अशा सूचना शाळांना केल्या आहेत. सुचनांचे पालन न केल्यास, शाळा, महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासनाने नुकतेच आदेश दिले आहेत. या आदेशाची आणि सुचनांची अंमलबजावणी शाळा, महाविद्यालयांनी करावी. आता शासनाने विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी ही शाळेची असल्याचे स्पष्ट केले आहे. शाळांनी काय उपाययोजना केल्या, याची शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यात येईल.- प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducationशिक्षण