शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 13:56 IST

अकोला: शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची होणारी छेडखानी, शोषण, शारीरिक अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची राहील, असे स्पष्ट करीत शाळांना त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याससुद्धा बजावले आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात आभा शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत याचिका दाखल केली होती.त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होतेसुचनांचे पालन न केल्यास, शाळा, महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची होणारी छेडखानी, शोषण, शारीरिक अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी आता शाळेची राहील, असे स्पष्ट करीत शाळांना त्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याससुद्धा बजावले आहे. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राशिवाय शिक्षक, कर्मचाºयांची नियुक्ती करू नये, असेही शासनाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयात आभा शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना, सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने सर्व शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही तुमची असल्याचे सांगत, त्यांनी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग अ‍ॅपची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी सूचना फलक लावावेत. तक्रार पेटी, शाळेच्या आवारात, प्रवेशद्वारावर सीसी कॅमेरे बसवावेत, प्रवेशद्वाराजवळ महिला, पुरूष सुरक्षा रक्षक नेमावा. शाळेतील मुलांच्या उपस्थितीबाबत सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस हजेरी नोंदवावी आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती पालकांना द्यावी आणि खासगी वाहनाने येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित वाहनचालकाच्या पडताळणी करण्याच्या सूचना पालकांना द्याव्यात. तसेच स्कूल बस, आॅटोरिक्षामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीस बसू देऊ नये. विद्यार्थी, विद्यार्थ्यांना निवासस्थानापर्यंतच सोडावे आणि शेवटच्या मुलीला निवासस्थानी सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका, शिक्षिका सोबत असावी. नसेल तर तशी नियुक्ती करावी. मुला-मुलींचे, प्रसाधनगृह स्वतंत्र व पुरेशा अंतरावर असावेत. मुलींच्या प्रसाधनगृहात महिला सेविका असाव्यात. शिक्षक, कर्मचाºयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे. विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक इजा पोहोचेल, अशी शिक्षा करू नये. मुलांचे पालक, नातेवाईक शाळेत येईपर्यंत त्यांचा ताबा महिला शिक्षिकेकडे द्यावा. विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीशिवाय कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओळखपत्र दाखविल्याशिवाय ताब्यात देऊ नये. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन, उपहारगृहासाठी नेमण्यात येणाºया कर्मचाºयांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय नियुक्ती करू नये, अशा सूचना शाळांना केल्या आहेत. सुचनांचे पालन न केल्यास, शाळा, महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासनाने नुकतेच आदेश दिले आहेत. या आदेशाची आणि सुचनांची अंमलबजावणी शाळा, महाविद्यालयांनी करावी. आता शासनाने विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी ही शाळेची असल्याचे स्पष्ट केले आहे. शाळांनी काय उपाययोजना केल्या, याची शाळांना भेटी देऊन पाहणी करण्यात येईल.- प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducationशिक्षण