महामार्गालगतचे अतिक्रमण काढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 02:46 IST2017-04-03T02:46:44+5:302017-04-03T02:46:44+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावमंजू शहरात जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरण व सौंदर्यीकरणास केंद्र सरकारने हिरवी झेंडी दिली आहे

महामार्गालगतचे अतिक्रमण काढणार!
बोरगावमंजू (अकोला), दि. २- राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावमंजू शहरात जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरण व सौंदर्यीकरणास केंद्र सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे, बस थांबा ते ग्रामसचिवालयापर्यंंंत महामार्ग हद्दीतील अतिक्रमणावर पुन्हा गजराज चालणार असून याआधी महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केलेल्या पिवळ्या निशाणीपर्यंंंत तसेच ऑगस्ट २0१६ मध्ये अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमण हटविले होते, हे विशेष; परंतु व्यावसायिकांनी परत आपले व्यवसाय महामार्ग हद्दीत थाटले तर या अतिक्रमणावर परत गजराज फिरणार असून लवकरच शहरातून जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ होईल, अशी विश्वसनीय सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली आहे.
भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण व रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्गाच्या विकासकामाचा मोहिमेचा एक भाग म्हणून अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) च्या माध्यमातून बोरगावमंजू शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे कि.मी. २३0, ३00 ते कि.मी. ३३.४00 पर्यंंंत पेव्हड शोल्डरसहित चौपदरीकरण करून (ईपीसी) पद्धतीने सुधारण करण्याकरिता केंद्र सरकार व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची संयुक्त चौपदरीकरण व सौंदर्यीकरण कामासाठी हिरवी झेंडी मिळाली आहे. सदर नियोजित शहरातून जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरणास प्रारंभ होईल.
या चौपदरीकरणाचे काम महामार्गाच्या दोन्ही बाजूने होत असून सदर चौपदरीकरणाच्या अनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी संबंधित बस थांबा ते ग्रामसचिवालयापर्यंंंत महामार्गाच्या हद्दीमधील व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविले होते, हे विशेष. परत व्यावसायकांनी दोन्ही बाजूने महामार्ग हद्दीत येणार्या जागेवर व्यवसाय थाटले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणास लवकरच प्रारंभ होत असून शहरातील व्यावसायिकांच्या अतिक्रमित बांधकामावर गजराज चालणार, एवढे मात्र निश्चित आहे.