शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बाधीत कुटुंबांना तीन दिवसांत तातडीची मदत; पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण होणार! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

By संतोष येलकर | Updated: July 26, 2023 17:11 IST

गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला असून, काही भागात अतिवृष्टीही झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात घरांसह शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर घरांचे नुकसान झालेल्या जिल्हयातील बाधीत कुटुंबांपर्यंत येत्या तीन चार दिवसांत तातडीची सानुग्रह मदत पोहोचविण्यात येणार असून, शेती आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामेदेखिल तीन चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी दिली. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला असून, काही भागात अतिवृष्टीही झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु असून, त्यामध्ये घरांचे नुकसान झालेल्या बाधीत कुटुंबांना तातडीची सानुग्रह मदत तीन चार दिवसांत देण्यात येणार असून, पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगीतले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.

पूरबाधीत क्षेत्राचा आराखडा सप्टेंबरपर्यत होणार तयार !जिल्हयात नदी व नाल्यांना येणारे पूर आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हयातील पूरबाधीत क्षेत्राचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत हा आराखडा तयार होणार असून, कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी करुन, पुढील वर्षीच्या पावसाळ्यापासून पुरामुळे जिल्हयात होणारे नुकसान टाळण्यास मदत होइल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शासकीय कामात अनियमितता खपवून घेतली जाणार नाही! -शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत व कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता आणि हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, योग्य ती कारवाइ करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला. आगामी वर्ष निवडणुकांचे राहणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी व्यपगत होणार नाही, उपलब्ध निधीतून कामे मार्गी लागतील, या दृष्टीने योग्य खबरदारी घेवून काम करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीRainपाऊसCropपीक