शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण; काँग्रेसला आव्हानात्मक - कुमार केतकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:48 IST

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते.लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले.

अकोला : विकासाचा बागुलबुवा उभा करून मोदींच्या नावावर निवडणूक जिंकलेल्या भाजपाची सर्व धोरणे निराशात्मक आहेत. सध्या देशातील वातावरण अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत भाजपाच्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक लढतील, असे प्रयत्न होताना दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही पक्षच एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, असे स्पष्ट करतानाच २०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलेस्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. केतकर म्हणाले, की २०१९ ची निवडणूक भाजपासाठी सोपी नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची गेल्या चार वर्षांत पूर्तता झालेली नाही. केवळ आश्वासने अन् घोषणा यापलीकडे सरकारचे कोणतेही काम दिसत नाही. विकास हा शब्द जणूकाही याच सरकारच्या काळात जन्माला आला, असा प्रपोगंडा निर्माण केला आहे. जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा अनेक पातळीवर सरकार अपयशी ठरले असून, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, व्यापारी नाराज आहेत. याचा फटका भाजपाला नक्कीच बसेल. लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पूर्ण बहुमतामध्ये भाजपा सरकार येणार नाही; मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. या पृष्ठभूमीवर काँग्रेसला आतापासूनच आपली ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले. महाराष्टÑ सरकारही दिल्लीच्या मर्जीवरच!राज्यात काँग्रेसची सत्ता असताना भाजपाने नेहमीच काँगे्रसचे सरकार हे हायकमांडच्या इशारावर चालते, अशी टीका केली. सध्याचे राज्यातील भाजपा सरकार हेसुद्धा वेगळे काय करीत आहे. मोदी-शहा यांनी हिरवी झेंडी दिल्याशिवाय एकही काम होत नाही. मुळातच हे सरकार स्वायत्त व सार्वभौम असल्याचे दिसत नाही. राज्यातही भाजपाची स्थिती कमकुवत आहे, त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका सोबतच होतील, असेही केतकर म्हणाले.

 संघच भाजपाचा खरा चेहरा - पटोलेराष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आमचा भाजपाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात संघच भाजपा चालवित आहे. भाजपाचा खरा चेहरा संघच आहे, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला. भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असून, येणाऱ्या काळात जनताच भाजपाला धडा शिकवेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेस