शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण; काँग्रेसला आव्हानात्मक - कुमार केतकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:48 IST

२०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते.लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले.

अकोला : विकासाचा बागुलबुवा उभा करून मोदींच्या नावावर निवडणूक जिंकलेल्या भाजपाची सर्व धोरणे निराशात्मक आहेत. सध्या देशातील वातावरण अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. अशा स्थितीत भाजपाच्या विरोधात सर्व पक्षीय एकत्र येऊन निवडणूक लढतील, असे प्रयत्न होताना दिसत असले, तरी प्रत्यक्षात काही पक्षच एकत्र येऊन आघाडी स्थापन करतील, असे स्पष्ट करतानाच २०१९ ची निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे. सोबतच काँग्रेससाठी ती आव्हानात्मक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केलेस्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित व्याख्यानाच्या निमित्ताने ते अकोल्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार नाना पटोले उपस्थित होते. केतकर म्हणाले, की २०१९ ची निवडणूक भाजपासाठी सोपी नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची गेल्या चार वर्षांत पूर्तता झालेली नाही. केवळ आश्वासने अन् घोषणा यापलीकडे सरकारचे कोणतेही काम दिसत नाही. विकास हा शब्द जणूकाही याच सरकारच्या काळात जन्माला आला, असा प्रपोगंडा निर्माण केला आहे. जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा अनेक पातळीवर सरकार अपयशी ठरले असून, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, व्यापारी नाराज आहेत. याचा फटका भाजपाला नक्कीच बसेल. लोकसभेत भाजपाच्या जागा या २०० ते १६० पर्यंत खाली येऊ शकतात, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. पूर्ण बहुमतामध्ये भाजपा सरकार येणार नाही; मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. या पृष्ठभूमीवर काँग्रेसला आतापासूनच आपली ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. पक्ष संघटना, लोकांचा विश्वास अशा अनेक पातळीवर काम करण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्या समोर असल्याचे ते म्हणाले. महाराष्टÑ सरकारही दिल्लीच्या मर्जीवरच!राज्यात काँग्रेसची सत्ता असताना भाजपाने नेहमीच काँगे्रसचे सरकार हे हायकमांडच्या इशारावर चालते, अशी टीका केली. सध्याचे राज्यातील भाजपा सरकार हेसुद्धा वेगळे काय करीत आहे. मोदी-शहा यांनी हिरवी झेंडी दिल्याशिवाय एकही काम होत नाही. मुळातच हे सरकार स्वायत्त व सार्वभौम असल्याचे दिसत नाही. राज्यातही भाजपाची स्थिती कमकुवत आहे, त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका सोबतच होतील, असेही केतकर म्हणाले.

 संघच भाजपाचा खरा चेहरा - पटोलेराष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेहमीच आमचा भाजपाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात संघच भाजपा चालवित आहे. भाजपाचा खरा चेहरा संघच आहे, असा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला. भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार असून, येणाऱ्या काळात जनताच भाजपाला धडा शिकवेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेस