शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:29 IST

भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे.

अकोला: भाजप सरकारच्या काळात उद्योग, कारखाने बुडाले. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. जात-धर्माच्या आधारे निवडणूक लढविली जात आहे. कलम ३७0 रद्द केल्याचा मुद्याचा वापर करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भाजप-सेना भुलथापा देणारे आहे. त्यामुळे जनतेने त्यांना थारा देऊ नये. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, असा हल्लाबोल आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी बाळापुरात चढविला.बाळापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी दुपारी बाळापुरातील बसस्थानकामागील मैदानात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. खासदार अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, भाजप-शिवसेना जाती, धर्माच्या आधारावर समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडत आहे. निवडणुका आल्या की, भाजप सरकार विकासाच्या मुद्यांवर बोलत नाही. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केली जाते. असे सांगत, खासदार ओवेसी यांनी, सध्या देशाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. जीएसटीमुळे व्यापार, उद्योगधंदे बुडत आहेत. बँका बंद पडत आहेत. महागाई वाढत आहे. भाजप सरकारला या देशाचा विकास नको आहे. त्यांना धर्माचा वापर करून जनतेमध्ये दहशत निर्माण करायची आहे. त्यामुळे जनतेने जात, धर्माचा विचार न करता, एमआयएमच्या उमेदवारांना साथ द्यावी. भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या भुलथापांना जनतेने थारा देऊ नये, असे आवाहन बाळापुरातील जनतेला केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019balapur-acबाळापूरAkolaअकोला