शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘ई-संजीवनी’ घरोघरी पोहोचलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 10:56 IST

E-Sanjeevani News राज्यातील केवळ १२ हजार १२१ रुग्णांनीच वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.

ठळक मुद्देअकोल्यातील ३८१ रुग्णांनी या अंतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. ई-संजीवनीचा सर्वाधिक उपयोग पुणे जिल्ह्यात घेण्यात आला.

- प्रवीण खेते

अकोला: कोरोना काळात रुग्णालये, दवाखान्यांमधील गर्दी टाळण्यासाठी शासनातर्फे ‘ई-संजीवनी’ या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे शक्य झाले; मात्र या अंतर्गत राज्यातील केवळ १२ हजार १२१ रुग्णांनीच वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. विदर्भात नागपूरनंतर अकोल्यातील ३८१ रुग्णांनी या अंतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला; परंतु हे प्रमाण खूप कमी असल्याचे दिसून येते.

कोविडच्या संसर्गाचा धोका टाळण्याच्या उद्देशाने ‘टेली आयसीयू’च्या धर्तीवर केंद्र शासनाने ‘ई-संजीवनी’ सुरू केली. या ॲपच्या माध्यमातून रुग्णांना घरी बसूनच थेट डॉक्टांशी संवाद साधणे शक्य झाले; परंतु या ॲपच्या वापरावरून नागरिकांमधील उदासीनता समोर येत आहे. मागील आठ महिन्यात अकोला जिल्ह्यातील केवळ ३८१ रुग्णांनीच याचा वापर केला. राज्यात ई-संजीवनीचा सर्वाधिक उपयोग पुणे जिल्ह्यात घेण्यात आला. जिल्ह्यातील १,७५५ रुग्णांनी ई-संजीवनीच्या माध्यमातून उपचार घेतला, तर नंदुरबार जिल्ह्यातील केवळ १० रुग्णांनीच ई-संजीवनीचा उपयोग घेतला. ही संख्या राज्यात सर्वात कमी आहे.

घरबसल्या ओपीडीची सुविधा

ई-संजीवनीच्या माध्यमातून रुग्णांना ऑनलाइन ओपीडीची सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये रिअल टाइम टेलिमेडिसनी, राज्यसेवा डॉक्टर, व्हिडिओ कॉलद्वारे सल्लामसलत, चॅटसेवा रुग्णांसाठी उपलब्ध आहे. यासाठी रुग्णांना कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

 

असा करा ई-संजीवनीचा उपयोग

  • गुगल प्लेस्टोअरवरून ई-संजीवनी ॲप डाउनलोड करा.
  • नोंदणी व टोकन जनरेशन करा.
  • लॉगइन करा.
  • प्रतीक्षालयावर क्लिक करा.
  • सल्लामसत करा.

 

ई-संजीवनीचा सर्वाधिक उपयोग झालेले जिल्हे

जिल्हा - रुग्णसंख्या

पुणे - १,७५५

रायगड - ९३२

बीड - ८८३

सोलापूर - ८२९

ठाणे - ८१७

नागपूर - ७७३

मुंबई - ७७०

नांदेड - ७०५

अहमदनगर - ६३२

लातुर - ४६०

अकोला - ३८१

वर्धा - ३२४

सर्वात कमी उपयोग असलेले जिल्हे

जिल्हा - रुग्णसंख्या

सांगली - ५३

बुलडाणा - ७७

जळगाव - ८२

परभणी - ७९

गडचिरोली - ७६

धुळे - ६४

चंद्रपूर - ६३

जालना - ५९

हिंगोली - ५८

सिंधुदुर्ग - ३७

रत्नागिरी - ३२

गोंदिया - ३२

नंदुरबार - १०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना घरीबसूनच वैद्यकीय सेवा मिळावी, या अनुषंगाने ‘ई-संजीवनी’ सुरू करण्यात आली; मात्र नागरिकांनी त्यांचा उपयोग घेतला नाही. विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक उपयोग अकोला जिल्ह्यात झाला असला, तरी हे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी ई-संजीवनीचा लाभ घ्यावा.

- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य