शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा केळीवेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:15 IST

अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.

ठळक मुद्देखासदार धोत्रेंचे स्पर्धेला नावआमदारांची भरघोस मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय ‘खासदार चषक’ कबड्डी स्पर्धा ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत केळीवेळी येथे होणार आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यंदा आपले ७५ वर्षे पूर्ण करीत असल्याने या हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची माहिती कबड्डी स्पर्धेचे संयोजक माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी दिली.शुक्रवारी, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दाळू गुरुजी यांनी स्पर्धेविषयी सविस्तर माहिती दिली. सवरेदयी नेते रामकृष्ण आढे यांनी १९४२ पासून सुरू  केलेले हनुमान मंडळ आज हीरक महोत्सव साजरा करीत आहे. या काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो खेळाडूंनी खेळप्रदर्शन केले. आजपर्यंत मंडळाच्यावतीने १३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्तरातील लोकांनी आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे केळीवेळीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे केळवेळीत भव्य क्रीडांगण उभारता आले, असेही दाळू गुरुजींनी सांगितले.यंदाच्या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांसह विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हय़ांतील महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था पीकेव्हीच्या कृषक भवन येथे करण्यात आली. या स्पर्धेला कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, राज्याध्यक्ष जितू ठाकूर यांच्यासह प्रस्तावाला ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनने मान्यता दिल्याने अखिल भारतीय स्तरावरील सामने हीरक महोत्सवी वर्षात होत असल्याचा आनंद होत असून, यानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असल्याचे दाळू गुरुजी म्हणाले. पत्रकार परिषदेला आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, कबड्डी संघटनेचे सचिव वासुदेव नेरकर, डॉ. राजकुमार बुले, गणेश पोटे, धनंजय मिश्रा, दिलीप आसरे व दिनकर गावंडे उपस्थित होते.

खासदार धोत्रेंचे स्पर्धेला नावखासदार संजय धोत्रे यांनी केळीवेळी गावाला दत्तक घेतले असल्याने त्यांच्याच नावे ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होत आहे.

आमदारांची भरघोस मदतकेळीवेळी गाव कबड्डीपटूंची पंढरी आहे. केळीवेळी गावाचे राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक व्हावे, तसेच अखिल भारतीय स्तर स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्याकरिता आमदार रणधीर सावरकर यांनी स्पर्धेला पाच लाखांचा निधी देणार असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणSportsक्रीडाKabaddiकबड्डी