शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

दुष्काळाची चाहूल; शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:55 IST

सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.

ठळक मुद्देजुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे.

अकोला: यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे. मूग, उडीद पिके बाद होणारयंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. जिल्ह्यात उडिदाचे क्षेत्र ११ हजार ९७८ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर मुगाचीही पेरणीही केवळ १२ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने जून अखेरीची सरासरीही गाठलेली नाही. ३० जूनपर्यंत १४३.६ मिमी पाऊस अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात १३३.२ मिमी पाऊस झाला तर ११ जुलैपर्यंत केवळ २१६.२ मिमी पाऊस झालेला आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे. जलसाठ्यात घट!अकोला शहराची जीवनरेखा बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात केवळ ४.७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात २६.२८ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, उमा शून्य टक्के, घुंगशी बॅरेज शून्य टक्के जलसाठा असून, मोर्णा धरणात आजमितीस ११.३९ टक्के जलसाठा आहे.

 जुलैअखेरपर्यंत कपाशी, सोयाबीनची पेरणीपावसाच्या उशिरामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीतल्या मूग व उडीद पिकाची पेरणी करता येणार नाही. सोयाबीन व येणारे कपाशीचे पीक घेता येणार आहे. सुधारित कपाशीच्या देशी सरळ वाणाची पेरणी करावी. यामध्ये २५ टक्के जादा बियाण्यांचा वापर व २५ टक्के कमी खतांचा वापर करावा, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ