शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन : कृषीप्रधान देशात शेतीला कनिष्ठ दर्जा - डॉ. विलास खर्चे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 17:33 IST

आज शेतीला कनिष्ठ लेखल्या जात असल्याची खंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी शनिवारी अकोल्यात व्यक्त केली.

नीलिमा शिंगणे-जगड/ अकोला: गावाचा जर विचार केला तर शेती हा मुख्यघटक आहे.  जगात जोपर्यंत अन्न सेवन करायचे आहे. तोपर्यंत शेतीला महत्त्व राहिलच. परंतु आज शेतीला कनिष्ठ लेखल्या जात असल्याची खंत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी शनिवारी अकोल्यात व्यक्त केली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यस्मृतीच्या निमित्ताने अकोला महानगरीत स्व.श्रीराम भाकरे महाराज साहित्य नगरीमध्ये ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ ला समर्पित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. दोन दिवसीय या संमेलनाचे उद्घाटन डॉ.विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. स्वराज भवन प्रांगणात संमेलन होत आहे.  संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राष्ट्रीय ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज चिंचोळकर होते.

डॉ. खर्चे पुढे म्हणाले की, अलीकडे शेतक-यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. यावर एकच उपाय म्हणजे गावागावातून शेतीचे शिक्षण मिळाले पाहिजे. शेतक-यांसाठी शिक्षण, संशोधन, विस्ताराचे कार्य वाढविले पाहिजे. बदलत्या परिस्थितीत नैसर्गिक संसाधनाच्या प्रतमध्ये समस्या येत आहे. नवनवीन संशोधन शेतीमध्ये यायला पाहिजे. परंतु युवावर्गच शेतीकडे पाठ फिरवित आहे. शेतीकडे तरू ण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. तरूण शेतीकडे वळला पाहिजे. यासाठी शेतीचे मुलभूत शिक्षण देण्याकरिता शेती शाळा-महाविद्यालय मोठया संख्येने उभे राहिले पाहिजेत, असेही डॉ. खर्चे यांनी सांगितले.

विदर्भाला निसर्गाने शेतीकरिता चांगले हवामान दिले आहे. याकरिता शेतक-यांना शास्त्रशुद्ध शेती करणे आवश्यक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे शेतक-यांना मुलभूत कृषी शिक्षण दिले जाते. परंतू शेतक-यांपर्यंत पोहचण्यासाठी मर्यादा येतात. किर्तनासारखे कार्यक्रम घेवून शेती शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्याकडे विद्यापीठ भर देत आहे. विद्यापीठाने राबविलेला हा उपक्रम संपूर्ण देशात सुरू व्हावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. यासाठी विदर्भातून विशेष पाऊले उचलले आहे, अशी माहिती देखील यावेळी डॉ. खर्चे यांनी दिली.

यावेळी विचारपीठावर ग्रामगीता प्रचारक गोवर्धन खवले, आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर, स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, राष्ट्रीय किर्तनकार हभप आमले महाराज, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आजीवन प्रचारक डॉ.भाष्कर विघे, भजनप्रचारक विजय मुंडगावकर, प्रभात चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष साहेबराव नारे, राष्ट्रसंत विचार अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती