शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 09:52 IST

Corona can be cure : लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेतसाध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो

अकोला: पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. मात्र, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेक रुग्णांचा सिटी स्कोअर दहापेक्षा जास्त असून, ऑक्सिजन पातळीही खालावलेली आहे. त्यामुळे ही दुसरी लाट अधिक घातक असल्याची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, योग्य वेळी चाचणी करून कोविडचे निदान केल्यास कमी वेळेत औषधोपचार करणे शक्य आहे. बहुतांश लोक असे न करता सुरुवातीचे तीन ते चार दिवस घरगुती उपचार करतात, बरे न वाटल्यास डाॅक्टरांकडे जातात, डॉक्टरांच्या औषधोपचाराने बरे न वाटल्यास रुग्ण कोविडची चाचणी करतात. तोपर्यंत कोविडची लागण होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी झालेला असतो. तोपर्यंत रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

म्हणून लोक चाचणी टाळतात

लक्षणे असूनही अनेक जण अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने चाचणी टाळतात.

पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबापासून दहा दिवस दूर राहण्याची चिंता.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात राहावे लागणार.

कुटुंबातील इतर सदस्यांना काही झाले तर.

 

तर तुम्ही कोरोनाची साखळी तोडू शकता.

वेळीच चाचणी केल्यास कोविडचे निदान शक्य.

निदान होताच, स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवून कोविडचा संसर्ग रोखता येतो.

तुमच्या संपर्कातील इतरही लोक चाचणी करून कोरोनाचा फैलाव रोखू शकतात.

 

पहिले दहा दिवस महत्त्वाचे

कोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.

पहिल्या तीन दिवसांतच रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

साध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो.

जनजागृतीची गरज

रुग्णाला कोविडचा संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून, स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करायला हवे, कोरोनापासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच प्रकृती अत्यवस्थ होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.

 

कोरोनाचे अर्ली डिटेक्शन झाल्यास रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्ण कमी वेळेत बरा होऊ शकतो, शिवाय त्याच्यापासून इतरांपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखणेही शक्य होते.

- डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, जीएमसी, अकोला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला