शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घाबरू नका; योग्य काळजी घेतल्यास कोरोनावर मात शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 09:52 IST

Corona can be cure : लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेतसाध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो

अकोला: पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. मात्र, कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्यासाठी नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच चाचणी करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अनेक रुग्णांचा सिटी स्कोअर दहापेक्षा जास्त असून, ऑक्सिजन पातळीही खालावलेली आहे. त्यामुळे ही दुसरी लाट अधिक घातक असल्याची भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. मात्र, डॉक्टरांच्या मते कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, योग्य वेळी चाचणी करून कोविडचे निदान केल्यास कमी वेळेत औषधोपचार करणे शक्य आहे. बहुतांश लोक असे न करता सुरुवातीचे तीन ते चार दिवस घरगुती उपचार करतात, बरे न वाटल्यास डाॅक्टरांकडे जातात, डॉक्टरांच्या औषधोपचाराने बरे न वाटल्यास रुग्ण कोविडची चाचणी करतात. तोपर्यंत कोविडची लागण होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी झालेला असतो. तोपर्यंत रुग्णाच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. हा प्रकार टाळण्यासाठी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

म्हणून लोक चाचणी टाळतात

लक्षणे असूनही अनेक जण अहवाल पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने चाचणी टाळतात.

पॉझिटिव्ह आल्यास कुटुंबापासून दहा दिवस दूर राहण्याची चिंता.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात राहावे लागणार.

कुटुंबातील इतर सदस्यांना काही झाले तर.

 

तर तुम्ही कोरोनाची साखळी तोडू शकता.

वेळीच चाचणी केल्यास कोविडचे निदान शक्य.

निदान होताच, स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवून कोविडचा संसर्ग रोखता येतो.

तुमच्या संपर्कातील इतरही लोक चाचणी करून कोरोनाचा फैलाव रोखू शकतात.

 

पहिले दहा दिवस महत्त्वाचे

कोरोनाची लागण झाल्यास पहिले दहा दिवस महत्त्वाचे आहेत.

पहिल्या तीन दिवसांतच रुग्णांवर योग्य उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो.

साध्या औषधोपचारानेच रुग्ण बरा होऊ शकतो.

जनजागृतीची गरज

रुग्णाला कोविडचा संसर्ग झाल्यापासून ते रुग्ण अत्यवस्थ होण्याचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला असून, स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करायला हवे, कोरोनापासून कसे सुरक्षित राहता येईल, तसेच प्रकृती अत्यवस्थ होण्यापूर्वीच नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.

 

कोरोनाचे अर्ली डिटेक्शन झाल्यास रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य आहे. त्यामुळे रुग्ण कमी वेळेत बरा होऊ शकतो, शिवाय त्याच्यापासून इतरांपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखणेही शक्य होते.

- डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, विभाग प्रमुख, मेडिसिन, जीएमसी, अकोला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला