शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रस्त्यासाठी २६ जानेवारीपासून गाढवाचे धरणे आंदोलन (गाढवाचे धरणे आंदोलन हा शब्दप्रयोग योग्य वाटत नाही...)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:58 IST

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-आसरा फाट्यापर्यंत राज्य महामार्ग असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे; त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची त्वरित ...

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-आसरा फाट्यापर्यंत राज्य महामार्ग असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे; त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यासाठी २६ जानेवारीपासून येथील उड्डाण पुलावर गाढवाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा हम चालीस संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

राष्ट्रशक्ती हमचालीस संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात नमूद आहे की, अमरावती, अकोला जिल्ह्यांना जोडणाऱ्या हिरपूरमार्गे ब्रह्मी-आसरा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने वाहनचालकांना हाडांच्या व मणक्यांच्या आजाराने ग्रासले आहे. तसेच अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोकप्रतिनिधी उदासीन असल्यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहे. रस्त्याची चाळण झाल्याने हिरपूरवासीयांना नाइलाजास्तव लांब अंतराच्या व जोखमीच्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या रस्त्याच्या कामासाठी हिरपूरवासीयांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्येक फाट्यावर लाक्षणिक उपोषणसुद्धा केले होते. त्याचा काहीही फायदा झाला नसल्याने आता २६ जानेवारी रोजी गाढवाचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रशक्ती हम चालीस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव डाबेराव यांनी सांगितले. निवेदन देताना बबनराव डाबेराव यांच्यासह तालुकाध्यक्ष रोहित सोळंके, सचिव किशोर सोनोने, विजय राऊत, मोहंमद शहाबुद्दीन, आकबर ठेकेदार आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री, बाळापूर, दर्यापूर व येथील आमदार तसेच ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहेत.