शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

गरिबांसाठी ५२ हजार क्विंटल धान्याची उचल सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:07 PM

Ration grain Akola ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री गरीब कल्याण योजना२० ऑक्टोबरपासून मोफत वितरण

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापित्रकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागामार्फत १० जुलै रोजी घेण्यात आला आहे. त्यानुसार दरमहा प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक गरीब लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्य वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत २१ हजार ४५८ क्विंटल गहू आणि ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ अशी एकूण ५२ हजार ३०९ क्विंटल धान्याची उचल सुरू केली आहे. जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये धान्याची उचल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमधून शिधापित्रकाधारक लाभार्थींना मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.

 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना ऑक्टोबर महिन्यातील मोफत धान्याचे वाटप करण्यासाठी ३० हजार ८५१ क्विंटल तांदूळ व २१ हजार ४५८ क्विंटल गहू इत्यादी धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे.

- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना