शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:23 IST

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली.पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

अकोला : सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज अशा सर्वच आघाड्यांवर पश्चिम विदर्भ बराच मागास असतानाही शासनाकडून पूर्व विदर्भाच्या पारड्यात भरभरून दान टाकल्या जात आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इतर विभागांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होती. तोच प्रकार आता विदर्भात होत आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाला झुकते माप दिले जात असल्याची भावना या भागातील लोकांमध्ये आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरिपातील पीक संकटात सापडले होते. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने जास्त सिंचन क्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी करताना महावितरणने तातडीने पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाच लाखांवर कृषी पंप आहेत. या पंपांना अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.आॅक्टोबरमध्ये वाढणार मागणीसप्टेंबर अखेरीस मॉन्सून काढता पाय घेतो. याच वेळी रब्बी पिकांची लागवड केली जाते. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास शेतकºयांची भिस्त सिंचनावरच असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कृषी पंपांना जास्त वेळ वीज पुरवठा मिळणे गरजेचे असते. या कालावधीत तरी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणVidarbhaविदर्भ