शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:23 IST

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली.पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

अकोला : सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज अशा सर्वच आघाड्यांवर पश्चिम विदर्भ बराच मागास असतानाही शासनाकडून पूर्व विदर्भाच्या पारड्यात भरभरून दान टाकल्या जात आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इतर विभागांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होती. तोच प्रकार आता विदर्भात होत आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाला झुकते माप दिले जात असल्याची भावना या भागातील लोकांमध्ये आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरिपातील पीक संकटात सापडले होते. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने जास्त सिंचन क्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी करताना महावितरणने तातडीने पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाच लाखांवर कृषी पंप आहेत. या पंपांना अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.आॅक्टोबरमध्ये वाढणार मागणीसप्टेंबर अखेरीस मॉन्सून काढता पाय घेतो. याच वेळी रब्बी पिकांची लागवड केली जाते. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास शेतकºयांची भिस्त सिंचनावरच असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कृषी पंपांना जास्त वेळ वीज पुरवठा मिळणे गरजेचे असते. या कालावधीत तरी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणVidarbhaविदर्भ