शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:23 IST

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली.पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

अकोला : सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज अशा सर्वच आघाड्यांवर पश्चिम विदर्भ बराच मागास असतानाही शासनाकडून पूर्व विदर्भाच्या पारड्यात भरभरून दान टाकल्या जात आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इतर विभागांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होती. तोच प्रकार आता विदर्भात होत आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाला झुकते माप दिले जात असल्याची भावना या भागातील लोकांमध्ये आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरिपातील पीक संकटात सापडले होते. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने जास्त सिंचन क्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी करताना महावितरणने तातडीने पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाच लाखांवर कृषी पंप आहेत. या पंपांना अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.आॅक्टोबरमध्ये वाढणार मागणीसप्टेंबर अखेरीस मॉन्सून काढता पाय घेतो. याच वेळी रब्बी पिकांची लागवड केली जाते. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास शेतकºयांची भिस्त सिंचनावरच असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कृषी पंपांना जास्त वेळ वीज पुरवठा मिळणे गरजेचे असते. या कालावधीत तरी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणVidarbhaविदर्भ