शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:02 IST

रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले.

महान : काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी दोन सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन्ही व्हॉल्व्हमधून प्रत्येकी १५० क्युसेसप्रमाणे ३०० क्युसेक पाणी नदीपात्रात विसर्ग करणे सुरू केले आहे. त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथळी भरून वाहत आहे. धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावांनाही त्याचा लाभ होणार आहे.महान धरणाच्या पाण्यावर नदीकाठावील शेकडो व्हेक्टर जमिनीवर या वर्षी गहू, हरभरासह भाजीपालाचा पेरा सर्वाधिक होणार आहे. महान धरणाच्या पाण्यावर महानपासून ते खांबोरा, उन्नई बंधाऱ्यावरील अनेक भागात शेतकरी वर्ग भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात पेरा करीत असतात. यावर्षी महान धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही, हे विशेष. गेल्या वर्षी महान धरणात १६ डिसेंबर २0१८ रोजी ६४.५४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी १६ डिसेंबर २0१९ रोजी महान धरणाचा जलसाठा ९८.९३ टक्के एवढा उपलब्ध असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात आज स्थितीला ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकºयांना रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत धरणाचे दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी नितनवरे, शाखा अभियंता घारे, एस.व्ही. जानोरकार, पिंपळकर, अमोल जोशी, पाठक, खरात, हातोलकर, आगे, झळके, टेमधरे हे नियोजन करीत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीagricultureशेती