शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:02 IST

रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले.

महान : काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी दोन सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन्ही व्हॉल्व्हमधून प्रत्येकी १५० क्युसेसप्रमाणे ३०० क्युसेक पाणी नदीपात्रात विसर्ग करणे सुरू केले आहे. त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथळी भरून वाहत आहे. धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावांनाही त्याचा लाभ होणार आहे.महान धरणाच्या पाण्यावर नदीकाठावील शेकडो व्हेक्टर जमिनीवर या वर्षी गहू, हरभरासह भाजीपालाचा पेरा सर्वाधिक होणार आहे. महान धरणाच्या पाण्यावर महानपासून ते खांबोरा, उन्नई बंधाऱ्यावरील अनेक भागात शेतकरी वर्ग भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात पेरा करीत असतात. यावर्षी महान धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही, हे विशेष. गेल्या वर्षी महान धरणात १६ डिसेंबर २0१८ रोजी ६४.५४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी १६ डिसेंबर २0१९ रोजी महान धरणाचा जलसाठा ९८.९३ टक्के एवढा उपलब्ध असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात आज स्थितीला ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकºयांना रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत धरणाचे दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी नितनवरे, शाखा अभियंता घारे, एस.व्ही. जानोरकार, पिंपळकर, अमोल जोशी, पाठक, खरात, हातोलकर, आगे, झळके, टेमधरे हे नियोजन करीत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीagricultureशेती