शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:02 IST

रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले.

महान : काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी दोन सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन्ही व्हॉल्व्हमधून प्रत्येकी १५० क्युसेसप्रमाणे ३०० क्युसेक पाणी नदीपात्रात विसर्ग करणे सुरू केले आहे. त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथळी भरून वाहत आहे. धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावांनाही त्याचा लाभ होणार आहे.महान धरणाच्या पाण्यावर नदीकाठावील शेकडो व्हेक्टर जमिनीवर या वर्षी गहू, हरभरासह भाजीपालाचा पेरा सर्वाधिक होणार आहे. महान धरणाच्या पाण्यावर महानपासून ते खांबोरा, उन्नई बंधाऱ्यावरील अनेक भागात शेतकरी वर्ग भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात पेरा करीत असतात. यावर्षी महान धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही, हे विशेष. गेल्या वर्षी महान धरणात १६ डिसेंबर २0१८ रोजी ६४.५४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी १६ डिसेंबर २0१९ रोजी महान धरणाचा जलसाठा ९८.९३ टक्के एवढा उपलब्ध असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात आज स्थितीला ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकºयांना रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत धरणाचे दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी नितनवरे, शाखा अभियंता घारे, एस.व्ही. जानोरकार, पिंपळकर, अमोल जोशी, पाठक, खरात, हातोलकर, आगे, झळके, टेमधरे हे नियोजन करीत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरीagricultureशेती