शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सौंदळा परिसरात पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST

--------------------------- चिडीमारांवर कारवाईची मागणी अकोट : शहरात चिडीमारांचा हैदोस वाढला असून, मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त करावा, ...

---------------------------

चिडीमारांवर कारवाईची मागणी

अकोट : शहरात चिडीमारांचा हैदोस वाढला असून, मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.

--------------------

घाणीच्या साम्राज्याने डासांचा प्रादुर्भाव

बाळापूर : शहरात अस्वच्छतेमुळे अनेक भागात मागील काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी नाल्या नियमित स्वच्छता होत नसल्याने तुंबल्या आहेत़

-------------------

वॉकला जाणाऱ्यांची रस्त्यावर वाढली गर्दी

तेल्हारा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली असताना सकाळी आणि सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता बळावली आहे.

---------------

नियोजित वेळेत बसेस सोडण्याची मागणी

चोहोट्टाबाजार : बसफेरी वेळेवर सोडण्यात येत नसल्याने नागरिकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊननंतर ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झाल्या परंतु त्यांच्या वेळा निश्चित केलेल्या नाहीत.

--------------------

बंद एटीएम ठरताहेत डोकेदुखी

वाडेगाव : राष्ट्रीयीकृत बँकांनी ग्राहकांच्या सोईसाठी एटीएम मशीन लावल्या; पण ही सेवा सध्या डोकेदुखी ठरत आहे. बहुतांश एटीएम बंद असल्याने ग्राहकांची भटकंती होत आहे. त्यामुळे तात्काळ एटीएम केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

-------------------

झुकलेल्या खांबांमुळे अपघाताची भीती

पातूर : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी उभारलेले वीजखांब पाऊस आणि वादळवाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादवेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.

-------------------

पाणंद रस्ते झाले चिखलमय

बाळापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवारात पाणंद रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली; परंतु अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत.

-------------------

वन्यप्राण्यांचा हैदोस; सोयाबीनचे नुकसान

म्हातोडी : खरीप हंगामातील सोयाबीन पीक चांगलेच बहरले आहे; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. हरणांचा कळप धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडीद ही पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

-----------------

जलस्रोतांची पातळी वाढली

मूर्तिजापूर : या वर्षी उन्हाळ्यात बहुतांश जलस्रोतांच्या पातळीत लक्षणीय घट झाली होती; मात्र गत आठवड्यात दमदार पाऊस पडल्याने तालुक्यातील प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. कूपनलिका, विहिरींची पातळीही वाढली आहे.

------------------------

बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी खंडित

पातूर : गत काही दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेडच्या इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे आपले सरकार केंद्रांतील कामे खोळंबून ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.