शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

अकोला जिल्ह्यात हिवतापाचा उतरता आलेख;  चार वर्षांत रुग्ण संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:24 IST

जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.

ठळक मुद्देवर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते. २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे.यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत.

- अतुल जयस्वालअकोला: मनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बºयाच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. आरोग्याच्या दृष्टीने हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य ‘तयारी हिवतापास हरविण्याची’, हे आहे. ‘अ‍ॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडियम ओव्हेल यांचा समावेश आहे.यापैकी प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. वर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवतापमुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आशादायी चित्र आहे.पाचही जिल्ह्यांत आशादायी चित्रआरोग्यसेवा (हिवताप) अकोला मंडळातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये पाचही जिल्ह्यांमधून २० लाख ५५ हजार ४६ रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी २८५ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. यावर्षी रुग्णांची संख्या लक्षणीय घटून ती केवळ ३६ वर आली.गत चार वर्षांत हिवताप निर्मूलनात बºयाच अंशी यश आले आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविता येते. हिवतापाला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, डासांच्या चाव्यापासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.

- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा, (हि.) अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य