शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत ...

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

एसडीओंना दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या वर्षीही झालेल्या पावसामुळे नदी व नाल्याकाठची शेती पूर्णपणे खरडून गेली असून, काही शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष शरद हजबे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, विवेक शिंदे, सचिन शिंदे, मुन्ना नाईकनवरे, संदीप चौढाळे, पत्रकार विलास नसले, गणेश म्हसाये, अमोल ढोक, नगरसेवक सचिन देशमुख, राजेंद्र काळे, गणेश मोरे, सुनील ढवळे, गजानन मोरे, आशिष कोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------

...अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी देणार लढा!

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, पाल्यांच्या शि‌क्षणाची जबाबदारी अशा प्रकारची अनेक संकटे उभी आहेत. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.