शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बधिरीकरणाचे इंजेक्शन सलाइनमधून दिल्याने रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 12:19 IST

अकोला : पातूर तालुक्यातील रहिवासी एका इसमास मूळव्याधाचा त्रास असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी रामदासपेठमधील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व त्यांच्या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवकाने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी बधिर करण्यासाठीचे इंजेक्शन चक्क सलाइनमधून दिल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाचा मुलगा व पत्नीने केला आहे.

अकोला : पातूर तालुक्यातील रहिवासी एका इसमास मूळव्याधाचा त्रास असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी रामदासपेठमधील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व त्यांच्या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवकाने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी बधिर करण्यासाठीचे इंजेक्शन चक्क सलाइनमधून दिल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाचा मुलगा व पत्नीने केला आहे. भूलतज्ज्ञ उपस्थित नसताना सलाइनमधून इंजेक्शन दिल्याने या रुग्णास रक्ताच्या उलट्या झाल्या व त्यानंतर काही तासांतच मृत्यू झाला.पातूर तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी दशरथ वानखडे हे अकोल्यात चौकीदारीचे काम करतात. त्यांना मूळव्याधाचा त्रास असल्याने ते २८ आॅक्टोबर रोजी रामदासपेठमध्ये असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. येथील एका परिचारिकेने त्यांना डॉ. अजयसिंह चव्हाण यांच्या प्रताप हॉस्पिटलचे नाव सुचविले. यावरून वानखडे कुटुंबीय प्रताप हॉस्पिटलमध्ये गेले असता डॉ. अजयसिंह चव्हाण याने त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यानुसार दशरथ वानखडे त्यांचा मुलगा व पत्नी २९ आॅक्टोबर रोजी डॉ. अजयसिंह चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. येथील परिचारिकेने त्यांना डॉक्टर शस्त्रक्रिया करीत असल्याचे सांगून दुपारी २ वाजतापर्यंत बसून ठेवले. त्यानंतर डॉक्टर आले असता त्यांनी गाठ झाल्याचे सांगून शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे वानखडे यांना सांगितले. त्यांनी शस्त्रक्रियेला होकार देताच दशरथ वानखडे यांना भरती करण्यात आले. ३० आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. तत्पूर्वी त्यांना तीन सलाइन देण्यात आले. दरम्यान, ३० आॅक्टोबर रोजी सकाळी एक सलाइन लावलेले असताना या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवक सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी आला आणि त्याने दशरथ वानखडे यांचे कागदपत्र व कोणतीही फाइल न तपासता त्यांच्या सलाइनमध्ये बधिर करण्याचे इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे काही वेळातच दशरथ वानखडे यांच्या हृदयाचे ठोके बंद पडले व रक्ताच्या उलट्या झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे वानखडे यांचा मुलगा व पत्नी प्रचंड घाबरल्याने त्यांना डॉ. चव्हाण याने सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे सांगितले. दशरथ वानखडे यांना सिटी हॉस्पिटलमध्ये हलविताच त्यांचा काही तासांतच मृत्यू झाला. डॉ. अजयसिंह चव्हाण व अमोल नामक युवक या दोघांची निष्काळजी आणि बधिरीकरणाचे इंजेक्शन सलाइनमधून दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार आकाश वानखडे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू