विजेच्या धक्क्याने गुराख्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 23:31 IST2016-08-28T23:31:19+5:302016-08-28T23:31:19+5:30
देऊ ळगावराजा येथील घटना; विज वाहिनी तुटून पडल्यामुळे दोन गायींसह गुराख्याचा मृत्यु.

विजेच्या धक्क्याने गुराख्याचा मृत्यू
देऊळगावराजा(जि. बुलडाणा),दि. २८: तालुक्यातील पांग्रीमाळी परिसरातील वेताळनगरमधील शे तकरी युवक दोन गायी चराईकरिता कुंभारी शिवारातील उदासी यांच्या पडीत शेतात घेऊन गेला असता शेतातील विद्युत पोलवरील तुटून पडलेल्या तारांना गायीचा स्पर्श झाल्याने दोन्ही गायी जागेवर मरण पावल्या. तर सदर युवकसुद्धा विद्युत तारांचा धक्का बसल्याने जागीच ठार झाल्याची घटना २८ ऑगस्टला घडली.
देऊळगावराजा वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील कुंभारी शिवरात बेलपत्र शेतात २७ ऑगस्टच्या रात्री ३ फेज लाइनमधील एक तार तुटून जमिनीवर पडला. यातील विद्युत पुरवठा खंडित झालाच नाही. तेव्हा २८ ऑगस्टला सकाळी ७ च्या सुमारास शेतकरी युवक गजानन वाघ आ पल्या दोन गायी चारण्याकरिता या पडीत शेताकडे घेऊन गेला. शेतातील तुटलेल्या विद्युत तारांना दोन्ही गायींचा धक्का लागून त्या ठार झाल्या. त्यानंतर गजानन हा त्या गायींना पाहण्यासाठी गेला असता त्यालासुद्धा विजेचा धक्का लागला. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृ तकाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी पुढील कारवाई केली. या घटनेची माहिती कार्यकारी अभियंता बुलडाणा यांना देणे महत्त्वाचे असतानासुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंंत त्यांच्या कार्यालयास घटनेची माहिती पुरविण्यात आली नव्हती. येथील उपअभियंता नांदूरकर हेसुद्धा मुख्यालयी हजर नसल्याने वीज वितरण कंपनी कार्यालयाचा सर्व कारभार चव्हाट्यावर आला.