शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शाळासिद्धी अंतर्गत शाळांच्या स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:29 IST

शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १00 टक्के स्वयंमूल्यांकन करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.

अकोला: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता वाढविणे महत्त्वाचे असून, त्यासाठी शैक्षणिक, भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने शाळासिद्धी कार्यक्रम सुरू केला आहे. शाळांना स्वयंमूल्यांकनासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १00 टक्के स्वयंमूल्यांकन करण्याचे निर्देश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.राज्यातील शाळांचे १00 टक्के स्वयंमूल्यांकन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी पोर्टलवर करणे आवश्यक असून, या पोर्टलवर शाळांना २0१९-२0 ची माहिती भरावी लागणार आहे. शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे १00 टक्के मूल्यांकन झाले पाहिजे. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाºयांची आढावा बैठक घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यामार्फत शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत शाळांचे १00 टक्के मूल्यांकन झाले पाहिजे. या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही शिक्षण संचालकांनी दिले आहेत. गतवर्षीप्रमाणे शाळांनी स्वयंमूल्यांकन करताना, पर्याप्तता व उपयोगिता, गुणवत्ता आणि उपयुक्तता या मुद्यांना उपलब्ध नाही, असे म्हणण्याची चूक करू नये. २0१८-१९ चे स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांपैकी ज्या शाळांना ए ग्रेड मिळाले आहेत. त्या शाळांना बाह्यमूल्यांकन करण्याबाबत वेगळ्या सूचना देण्यात येणार आहेत. शाळांची संख्या लक्षात घेता, जिल्हा स्तरावर शाळासिद्धी संपर्क अधिकारी, तालुकास्तरीय संपर्क निर्धारक नियुक्त करण्याचे निर्देशही शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा