शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

दिन विशेष : लाचखोरी प्रतिबंधक कारवाईत पुणे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:27 IST

ज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे.

ठळक मुद्देपुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले.औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे.

- सचिन राऊत

 अकोला: राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध उपक्रम राबवित जनजागृती करून लाचखोरांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न होत असतानाच राज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे, तर मुंबईची सपशेल माघार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.राज्यातील आठ विभागात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईमध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्या पाठोपाठ नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले असून १३४, तर तिसऱ्या क्रमांक औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ११ महिन्यांच्या कालावधीत ९७ सापळे रचून १०१ गुन्हे नोंदविले आहेत, तर अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ९६ सापळे रचून ९९ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ८३ सापळे रचून ८५ जणांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यात सर्वात कमी कारवाया सर्वात मोठा जिल्हा आणि मंत्रालय असलेल्या मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झालेल्या आहेत. मुंबई विभागात केवळ ४४ कारवाया झाल्याचे वास्तव आहे. राज्यात ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरांना ताळ्यावर आणण्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खाते अव्वल स्थानावर आहे.२५२ प्रकरणात दोषारोपपत्र दाखलराज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी २५२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागाने ५४ प्रकरणांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, पुणे विभागाने ५१, मुंबई विभागाने ४, नांदेड विभागाने ३८, ठाणे विभागाने ११, नागपूर ३४, नाशिक ३१ तर अमरावती विभागाने २९ प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहेत. अमरावती विभाग ढिम्मअमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई अन्य विभागाच्या तुलनेत ढिम्म असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कारवाया वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून उपक्रम राबविण्यात येत असतानाही अमरावती विभागाच्या कारवाया मात्र कमी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग