शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

दिन विशेष : लाचखोरी प्रतिबंधक कारवाईत पुणे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:27 IST

ज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे.

ठळक मुद्देपुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले.औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे.

- सचिन राऊत

 अकोला: राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध उपक्रम राबवित जनजागृती करून लाचखोरांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न होत असतानाच राज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करून प्रतिबंधक कारवायामध्ये पुणे अव्वल आले आहे, तर मुंबईची सपशेल माघार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.राज्यातील आठ विभागात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईमध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १८० सापळे रचले असून, १८४ लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्या पाठोपाठ नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने याच कालावधीत ११९ सापळे रचले असून १३४, तर तिसऱ्या क्रमांक औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा असून, त्यांनी या कालावधीत १०८ सापळे रचून १११ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ११ महिन्यांच्या कालावधीत ९७ सापळे रचून १०१ गुन्हे नोंदविले आहेत, तर अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ९६ सापळे रचून ९९ लाचखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ८३ सापळे रचून ८५ जणांविरुद्ध कारवाई करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यात सर्वात कमी कारवाया सर्वात मोठा जिल्हा आणि मंत्रालय असलेल्या मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झालेल्या आहेत. मुंबई विभागात केवळ ४४ कारवाया झाल्याचे वास्तव आहे. राज्यात ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ लाचखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरांना ताळ्यावर आणण्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक खाते अव्वल स्थानावर आहे.२५२ प्रकरणात दोषारोपपत्र दाखलराज्यात गत ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८६८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यापैकी २५२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद विभागाने ५४ प्रकरणांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, पुणे विभागाने ५१, मुंबई विभागाने ४, नांदेड विभागाने ३८, ठाणे विभागाने ११, नागपूर ३४, नाशिक ३१ तर अमरावती विभागाने २९ प्रकरणांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहेत. अमरावती विभाग ढिम्मअमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची कारवाई अन्य विभागाच्या तुलनेत ढिम्म असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. कारवाया वाढविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून उपक्रम राबविण्यात येत असतानाही अमरावती विभागाच्या कारवाया मात्र कमी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग