वर्‍हाडातील धरणांची पातळी ‘जैसे थे’!

By Admin | Updated: August 4, 2014 20:26 IST2014-08-04T00:58:54+5:302014-08-04T20:26:09+5:30

पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने या विभागातील जलसाठय़ाची स्थिती गंभीर आहे.

The dams of 'Varadhas' were 'like'! | वर्‍हाडातील धरणांची पातळी ‘जैसे थे’!

वर्‍हाडातील धरणांची पातळी ‘जैसे थे’!

अकोला : अध्र्याच्या वर पावसाळा संपला; पण पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने या विभागातील जलसाठय़ाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.८५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाऊसच नसल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात १४.३६ दलघमी ३५ टक्के, निगरुणा २३ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहर पूर संरक्षक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २२.७७ दलघमी म्हणजेच ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तसेच ज्ञानगंगा प्रकल्प ३९ टक्के, मस २७ टक्के, कोराडी ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पुस या मोठय़ा प्रकल्पात १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, लोअरपूसमध्ये ५0 टक्के साठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाची हीच गंभीर अवस्था आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्यावर पोहोचली आहे. तर उमा प्रकल्पात १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिलतीलच वाण या धरणात मात्र ८२ आणि पोपटखेड धरणात ७५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: The dams of 'Varadhas' were 'like'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.