शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

अतिवृष्टीच्या तडाख्यात जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ ...

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवार, २३ जुलै रोजी शासनाकडे पाठविण्यात आला.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामध्ये अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर व पातूर या चार तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला असून, अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीमुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, ४ हजार २४९ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसह शेतजमिनीचे नुकसान तसेच घरांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय असे आहे पिकांचे नुकसान...

तालुका क्षेत्र ( हेक्टर)

अकोला १९०७९

बार्शिटाकळी १८५०

अकोट १५०

तेल्हारा ३००

बाळापूर १२२४६

मूर्तिजापूर १७३

....................................................

एकूण ३३७९८

३३४ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३४ मोठ्या व लहान दुधाळ जनावरांसह ३९ कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असून, पशुपालकांच्या मदतीसाठी १४ लाख १५ हजार ९५० रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचेही प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

३३० गावांतील ३७८३ कुटुंबे बाधित

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ३३० गावांतील ३ हजार ७८३ कुटुंबे बाधित झाली असून, २५९ व्यक्तींना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेे आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.

अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

- संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.