शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘आपले सरकार’ केंद्र बंद ठेवल्यास होणार दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:51 PM

अकोला : ग्रामीण भागातील शासनाच्या सेवा ठरावीक काळात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. ठरलेल्या मुदतीत केंद्र सुरू न झाल्यास दरदिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. नियमित काम करत नाही, सातत्याने गैरहजर राहतो, यावरही कंपनीला दंड केला जाणार आहे.

अकोला : ग्रामीण भागातील शासनाच्या सेवा ठरावीक काळात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र बंद ठेवल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा संबंधितांनी तक्रार करावी लागणार आहे.ग्रामीण जनतेला त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच सर्व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पंचायत राज संस्थांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प सुरू केला. त्यासाठी सीएससी-एसपीव्हीएस कंपन्यांसोबत करारनामा झाला. त्या करारनाम्यानुसार उपक्रम राबवताना त्रुटी, अडचणी निर्माण झाल्या. त्या दूर करतानाच संबंधित कंपन्यांना देयक अदा करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला.त्यानुसार सीएससी-एसपीव्हीने केंद्र स्थापन केल्यानंतर ६० दिवसांत केंद्र चालकाची नेमणूक करणे बंधनकारक केले आहे. ठरलेल्या मुदतीत केंद्र सुरू न झाल्यास दरदिवसाला ४५० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. केंद्रातील हार्डवेअर (संगणक, प्रिंटर, वेब कॅमेरा) दुरुस्ती किंवा ते बदलून देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. त्याबाबतची तक्रार हेल्पडेस्कवर नोंदवल्यानंतर २१ दिवसांत दुरुस्ती किंवा बदली न झाल्यास ग्रामपंचायतीने स्वखर्चाने ते करावे, त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाºयांना द्यावी, त्यानुसार कंपनीकडून दंडाची रक्कम देयकातून कपात केली जाणार आहे.कंपनीने नियुक्त केलेला केंद्र चालक नियमितपणे हजर राहत नाही, नियमित काम करत नाही, सातत्याने गैरहजर राहतो, यावरही कंपनीला दंड केला जाणार आहे. एका महिन्यातील या सर्व बाबींचा आढावा घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कंपनीच्या देयकातून दंडात्मक रकमेची वसुली करण्याचे अधिकार शासनाने १७ मार्च रोजीच्या आदेशातून दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकार