शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:47 AM

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग व उडीद पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून विमा हप्त्यापोटी (प्रीमियम) १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडे जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसात खंड पडल्याने जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी कोंब फुटले. ज्वारी काळीभोर पडली असून, कोंब फुटले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक पंचनाम्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु पीक विमा धोरणाच्या निकषांनुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा दाव्याची रक्कम ७०८ कोटी!जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या पीक विमा दाव्याची एकूण रक्कम ७०८ कोटी ३९ लाख रुपये इतकी होते. जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने, पीक विमा दाव्याची रक्कम शेतकºयांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी