शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सीसीआयने कापूस खरेदी सुरू करताच कोसळले सरकी, ढेपचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:48 IST

४,३०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणारी सरकी ढेप आता १,६०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे.

- संजय खांडेकर

 अकोला : कापूस कार्पोरेशन आॅफ इंडियाने कापसाची विक्रमी सुरू करताच सरकी ढेपीचे भाव कमालीचे कोसळले आहे. अचानक भाव कोसळ््याने पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी साठेबाजी करणाऱ्या अनेक व्यापारी-उद्योजकांना कोट्यवधीचा फटका बसला आहे. मागील काही महिन्यांआधी ४,३०० रुपये क्विंटल दराने विकल्या जाणारी सरकी ढेप आता १,६०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपली आहे.सीसीआय आणि कापूस पणन महासंघाने यंदा १५० लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून, अजूनही खरेदी सुरूच आहे. खासगी यंत्रणेकडे यंदा कापूस आणि त्यावर प्रक्रिया होत असलेली सरकी नसल्याने सटोडियांनी सरकी ढेपीचे भाव पाडल्याचे बोलले जाते. सरकी ढेप मोठ्या प्रमाणात खाली उतरल्याने अनेकांना कोट्यवधीचा आर्थिक फटका बसला आहे. अकोला जिल्हा परिसरात कापसाचा पेरा जास्त असल्याने शहराच्या एमआयडीसीत आणि जिल्ह्यात जवळपास २०० सरकी ढेपीचे उद्योग आहेत. कापूस आणि त्यापासून निघणाºया सरकीवर प्रक्रिया करणाºया उद्योगांची संख्या जास्त आहे. दुधाळ जनावरांसाठी सरकी ढेप परिणामकारक ठरत असल्यामुळे अकोल्यातील सरकी ढेपीला देशभरात मोठी मागणी आहे. सरकी ढेपीचे भावदेखील अकोल्यातूनच उघडतात. १,५०० ते २,००० रुपये क्विंटलपर्यंत चढ-उतार होणारे सरकी ढेपीचे भाव गत काही महिन्यांपासून थेट ४,३०० रुपयांपर्यंत पोहोचले. सरकी ढेपीत आलेल्या कृत्रिम तेजीमुळे पशुपालक अडचणीत आले होते. त्याचा परिणाम दूध उत्पादकांवर आणि दूध कंपनीवरदेखील झाला. दुधाचे भाव लीटरमागे ६ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. आता सरकी ढेपीचे भाव उतरले तर दुधाचे दर कमी व्हायला हवे. यावर दूध उत्पादकांनी चुप्पी साधली आहे. 

 एनसीडीईएक्स, साठेबाज  आणि बँका अडचणीत सरकी ढेपीच्या चढ-उताराच्या दरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. म्हणून एनसीडीईक्स आणि इतर खासगी व्यापारी सरकी ढेपीची साठेबाजी करीत असतात. सरकी ढेपीला भाव मिळत असल्याने अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून साठा गोडावूनमध्ये ठेवलेला आहे. त्यावर अनेक बँकांचे तारण कर्जदेखील काढले आहे. आता सरकी ढेपीचे भाव कोसळल्याने साठेबाजी करणारे आणि त्यांना कर्ज देणाºया बँका अडचणीत सापडल्या आहे. यामध्ये अकोल्यातील दोन बँकांचा समावेश आहे.

 सटोडियांनी पाडले सरकी ढेपीचे भावसीसीआयने यंदा १०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. सोबतच पणन महासंघानेदेखील राज्यात ५० लाख क्विंटल कापूस खरेदी केला. म्हणजेच यंदा १५० लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली. शासनाकडूनच यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी झाली अन् कास्तकारालादेखील त्याचा चांगला मोबदला मिळाला. त्यामुळे व्यापारी-उद्योजक आणि खासगी व्यवस्थेच्या हाती यंदा कापूस पाहिजे त्या तुलनेत लागला नाही. पाच क्विंटल कापसात केवळ एक क्विंटल सरकी निघते. आजघडील शासनाकडे असलेल्या १५० लाख कापसातून जवळपास ३० लाख क्विंटल सरकी निघणार आहे. सध्या सरकीदेखील शासनाच्याच ताब्यात असल्याने उद्योजकांनी सरकी ढेपीचे भाव पाडले आहे. सटोडियांनी कृत्रिम पद्धतीने सरकी ढेपीचे भाव वाढवून दिले होते. कापूस आणि सरकी हातून गेल्याने सटोडियांनी सरकी ढेपीचे भाव पाडले, हे आता उघड होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार