शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: May 25, 2014 01:04 IST

अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याकरिता १६0 लाख बीटी कापसाच्या पाकिटांची गरज भासणार आहे. या दृष्टीने बियाणे कंपन्यांनी व कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगितले जात असले तरी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर भर दिला होता. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात जवळपास १७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि अतवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फटका बियाण्यांना बसला, परिणामी यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभाग पातळीवर वर्तविण्यात येत होती. ती शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारीवरू न काहीअंशी खरी वाटत आहे. अकोला जिल्हय़ात यावर्षी ४0 हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे; परंतु हे नियोजन केवळ कागदावर असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केली आहेत; परंतु अजूनपर्यंत शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात ४0 हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढणार आहे; असा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांना हव्या असलेल्या बीटी कापसाची मागणी बाजारात केली आहे; परंतु नेमके तेच बियाणे शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. परप्रांतातील काही कापसाच्या जातीचा मध्यंतरी प्रचार करण्यात आला आहे. बाजारात हवे ते बियाणे मिळणे कठीण झाल्याने काही शेतकर्‍यांनी त्या कापूस बियाण्यांची चौकशी करणे सुरू केले आहे.