शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: May 25, 2014 01:04 IST

अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता आहे.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सात ते आठ लाख हेक्टर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याकरिता १६0 लाख बीटी कापसाच्या पाकिटांची गरज भासणार आहे. या दृष्टीने बियाणे कंपन्यांनी व कृषी विभागाने नियोजन केले असल्याचे सांगितले जात असले तरी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गतवर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकावर भर दिला होता. त्यामुळे एकट्या अमरावती विभागात जवळपास १७.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि अतवृष्टीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा फटका बियाण्यांना बसला, परिणामी यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता कृषी विभाग पातळीवर वर्तविण्यात येत होती. ती शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारीवरू न काहीअंशी खरी वाटत आहे. अकोला जिल्हय़ात यावर्षी ४0 हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खतांचे नियोजन केले आहे; परंतु हे नियोजन केवळ कागदावर असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केली आहेत; परंतु अजूनपर्यंत शेतकर्‍यांना योग्य दरात बियाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हय़ात ४0 हजार हेक्टर कापसाचे क्षेत्र वाढणार आहे; असा अंदाज वर्तविण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांना हव्या असलेल्या बीटी कापसाची मागणी बाजारात केली आहे; परंतु नेमके तेच बियाणे शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. परप्रांतातील काही कापसाच्या जातीचा मध्यंतरी प्रचार करण्यात आला आहे. बाजारात हवे ते बियाणे मिळणे कठीण झाल्याने काही शेतकर्‍यांनी त्या कापूस बियाण्यांची चौकशी करणे सुरू केले आहे.