शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाचा धसका : शहरे वगळून ग्रामीण भागात शाळा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 14:39 IST

ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले.

अकोला : कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला. त्यानुसार तालुका स्तरापर्यंतच्या शहरातीलच शाळा बंद ठेवल्या जातील, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. त्यावर उद्या रविवारपर्यंत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्या पत्रात ग्रामीण भागाचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहेत. त्याबाबत पत्रात उल्लेख नसल्याने शाळा सुरूच राहतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ठग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या शहरांतही शाळा आहेत. त्या शाळा सुरू ठेवाव्या की बंद, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. उद्या रविवारपर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण येईल, असेही ठग यांनी सांगितले. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत; मात्र यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणचे जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाAkolaअकोला