शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोरोनाचा धसका : शहरे वगळून ग्रामीण भागात शाळा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 14:39 IST

ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले.

अकोला : कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला. त्यानुसार तालुका स्तरापर्यंतच्या शहरातीलच शाळा बंद ठेवल्या जातील, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. त्यावर उद्या रविवारपर्यंत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्या पत्रात ग्रामीण भागाचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहेत. त्याबाबत पत्रात उल्लेख नसल्याने शाळा सुरूच राहतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ठग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या शहरांतही शाळा आहेत. त्या शाळा सुरू ठेवाव्या की बंद, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. उद्या रविवारपर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण येईल, असेही ठग यांनी सांगितले. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत; मात्र यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणचे जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाAkolaअकोला