शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कोरोना : अकोल्याचा मृत्युदर घसरला, पण विदर्भात अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 10:31 AM

CoronaVirus News विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे.

अकोला: गत महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोविडचा मृत्युदर ३ टक्क्यांहून घसरून २.८ टक्क्यांवर आला आहे. मात्र, मृत्युदराचा हा आकडा विदर्भात सर्वाधिक असल्याचे चित्र दिसून येते. मृत्युदर कमी झाल्याचा दिलासा असला, तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती, तर ८८.१ टक्के रिकव्हरी रेट अकोला जिल्ह्याचा आहे. वाढती रुग्णसंख्या आणि बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात जवळपास सर्वत्रच कोरोना संसर्गाचा वेग मंदावला होता. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अकोल्यासह अमरावती, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. गत आठवडाभरापासून कोरोनाने विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात कहर केला. दररोज प्राप्त अहवालाच्या ५० टक्के रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागल्याने चिंता वाढली. त्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले. विदर्भात सर्वात कमी रिकव्हरी रेट ८२.९ टक्के अमरावती जिल्ह्याचा आहे. या दरम्यान अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचा मृत्युदर घसरून २.८ टक्क्यांवर आल्याने थोडा दिलासा मिळाला. मात्र, हा आकडा विदर्भात अव्वल स्थानी असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मागील नऊ महिन्यांत रुग्णसंख्या वाढीमध्ये चढ-उतार झाला, तरी मृत्युदर मात्र ३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा मृत्युदर २.१६ टक्क्यांवर आला होता. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे आवश्यक प्रयत्न केले जात असले, तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.

 

अशी आहे विदर्भातील स्थिती

जिल्हा - बरे होणारे रुग्ण - मृत्युदर (टक्क्यांमध्ये)

अकोला - ८८.१ - २.८

अमरावती- ८२.९ - १.५

भंडारा - ९६.३ - २.३

बुलडाणा - ९१ - १.६

चंद्रपूर - ९६.८ - २

गडचिरोली - ९८ - १

गोंदिया - ९८.१ - १.२

नागपूर - ९३.४ - २.४

वर्धा - ९३.४ - २.६

वाशिम - ९४ - २.१

यवतमाळ - ९१.७ - २.८

नागरिकांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कुठलाही आजार अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा. वेळेतच कोविडची चाचणी करावी. पॉझिटिव्ह येताच रुग्णालयात दाखल व्हावे. रुग्णसंख्या वाढ आणि मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या