शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात काँग्रेसला प्रभावी उमेदवाराचा शोध; भारिपसोबत आघाडीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:19 IST

कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती.अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे.

- राजेश शेगोकार अकोला : लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. ती साथ मिळाली असती, तर १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीला मिळालेले यश कदाचित पुन्हा एकदा मिळविता आले असते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे. अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक ठरते, असा आरोप काँगे्रसच्या गोटातून नेहमीच होता. त्या आरोपाला उत्तर देताना अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘काँग्रेसला मोठे करणे ही माझी जबाबदारी नाही’ असे अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.वसंतराव साठे यांच्यासारख्या आयात उमेदवारालाही दोन वेळा खासदार करणारा अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी असे म्हणण्याचे कारण म्हणजे, याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणेही कठीण झाले आहे. स्व. नानासाहेब वैराळे हे १९८४ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे खासदार, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपाला सहा वर्षांची विश्रांती देण्यात यश आले; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच, हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसच्या ‘हाता’तून एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.या सर्व पृष्ठभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन काँग्रेस भाजपाच्या विजयी रथाला थांबवायचे मनसुबे आखत होते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनीच ‘एमआयएम’सोबत आघाडी केल्याने काँग्रेसपुढे उमेदवार निवडीचेच आव्हान आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९