शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

अकोल्यात काँग्रेसला प्रभावी उमेदवाराचा शोध; भारिपसोबत आघाडीचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:19 IST

कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती.अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे.

- राजेश शेगोकार अकोला : लोकसभा मतदारसंघात भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी होती. ती साथ मिळाली असती, तर १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस आघाडीला मिळालेले यश कदाचित पुन्हा एकदा मिळविता आले असते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा पवित्रा घेतल्याने काँगे्रसमधून अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर टीका होत आहे. अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक ठरते, असा आरोप काँगे्रसच्या गोटातून नेहमीच होता. त्या आरोपाला उत्तर देताना अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘काँग्रेसला मोठे करणे ही माझी जबाबदारी नाही’ असे अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे कुणाचे तरी बोट धरून अकोल्यात यश मिळविण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर जय मिळवून देणारा चेहरा आता काँग्रेसला शोधावा लागणार आहे.वसंतराव साठे यांच्यासारख्या आयात उमेदवारालाही दोन वेळा खासदार करणारा अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. एकेकाळी असे म्हणण्याचे कारण म्हणजे, याच मतदारसंघात काँग्रेसला लोकसभेसाठी प्रभावी ‘चेहरा’ सापडणेही कठीण झाले आहे. स्व. नानासाहेब वैराळे हे १९८४ मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे खासदार, त्यानंतर या मतदारसंघावर भाजपाने निर्माण केलेले वर्चस्व काँग्रेसला स्वबळावर मोडून काढता आले नाही. १९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन भाजपाला सहा वर्षांची विश्रांती देण्यात यश आले; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच, हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध करून काँग्रेसच्या ‘हाता’तून एक-एक सत्ताकेंद्र हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.या सर्व पृष्ठभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन काँग्रेस भाजपाच्या विजयी रथाला थांबवायचे मनसुबे आखत होते; मात्र आता अ‍ॅड. आंबेडकरांनीच ‘एमआयएम’सोबत आघाडी केल्याने काँग्रेसपुढे उमेदवार निवडीचेच आव्हान आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९