शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:29 IST

जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.

अकोला: मोदी लाट संपली, या भ्रमात लोकसभा निवडणूक लढवून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आता पराभवापासून धडा घेत पक्ष संघटनेत नव्याने चैतन्य निर्माण करण्याची रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्यासाठी हिदायत पटेल यांच्या रूपाने मुस्लीम उमेदवार देण्याची खेळी काँग्रेसने खेळली होती. या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांचे मताधिक्य कमी होऊन ते तिसºया क्रमांकावर जातील, असा होरा काँग्रेस नेत्यांचा होता. प्रत्यक्षात मात्र आंबेडकरांनी आपले मताधिक्य वाढवित दुसºया क्रमांकावर झेप घेत काँग्रेसला मागे ढकलले. काँग्रेसच्या हातातून परंपरागत मतेही निसटल्याचे निकालाची आकडेवारी स्पष्ट करते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असून, पक्ष संघटना कमकुवत ठरत असल्याचा निष्कर्ष यानिमित्ताने काढल्या जात आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आता दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल व महानगर काँगे्रसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांची त्या-त्या पदावर फेरनिवड करण्यात आली होती. पटेल हे लागोपाठ दुसºया निवडणुकीत पराभूत झाले असून, चौधरी यांच्या विरोधातही नाराजीचा सूर जाहीरपणे प्रकट झाला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संग्राम गावंडे यांची निवड करण्यात आली आहे तर महानगर अध्यक्षपदी प्रभारी असलेल्या राजू मुलचंदाणी यांना पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीआधी रफीक सिद्दीकी यांना कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. राष्टÑवादी काँग्रेसमध्येही गटबाजी तीव्र असून, लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या बैठका घेण्याची वेळ पक्षावर आली होती, तर एका गटाने नाहक कटकट नको, या उद्देशातून पक्षाच्या होर्डिंग-बॅनरवर एकमेकांचे छायाचित्र न छापण्याची भूमिका घेतली. कार्यक्रमाचा जो आयोजक असेल, त्याने त्यांच्यापुरते छायाचित्र छापावेत, असा अलिखित नियम घालून घेतल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई येथे ७ व ८ जून रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना प्रामुख्याने बोलाविण्यात आले असून, पक्ष संघटना हाच मुद्दा ऐरणीवर राहणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण