शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेत फेरबदलाचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:29 IST

जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.

अकोला: मोदी लाट संपली, या भ्रमात लोकसभा निवडणूक लढवून दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसने आता पराभवापासून धडा घेत पक्ष संघटनेत नव्याने चैतन्य निर्माण करण्याची रणनीती आखली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा व तालुका स्तरावर पक्ष संघटनेत बदल करून नव्या नेतृत्वाच्या हाती संघटना सोपविण्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कोंडी करण्यासाठी हिदायत पटेल यांच्या रूपाने मुस्लीम उमेदवार देण्याची खेळी काँग्रेसने खेळली होती. या उमेदवारामुळे प्रकाश आंबेडकरांचे मताधिक्य कमी होऊन ते तिसºया क्रमांकावर जातील, असा होरा काँग्रेस नेत्यांचा होता. प्रत्यक्षात मात्र आंबेडकरांनी आपले मताधिक्य वाढवित दुसºया क्रमांकावर झेप घेत काँग्रेसला मागे ढकलले. काँग्रेसच्या हातातून परंपरागत मतेही निसटल्याचे निकालाची आकडेवारी स्पष्ट करते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असून, पक्ष संघटना कमकुवत ठरत असल्याचा निष्कर्ष यानिमित्ताने काढल्या जात आहे. येणाºया विधानसभा निवडणुकीचे आव्हान पेलण्यासाठी आता दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हिदायत पटेल व महानगर काँगे्रसचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांची त्या-त्या पदावर फेरनिवड करण्यात आली होती. पटेल हे लागोपाठ दुसºया निवडणुकीत पराभूत झाले असून, चौधरी यांच्या विरोधातही नाराजीचा सूर जाहीरपणे प्रकट झाला होता. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संग्राम गावंडे यांची निवड करण्यात आली आहे तर महानगर अध्यक्षपदी प्रभारी असलेल्या राजू मुलचंदाणी यांना पूर्णवेळ जबाबदारी देण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीआधी रफीक सिद्दीकी यांना कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. राष्टÑवादी काँग्रेसमध्येही गटबाजी तीव्र असून, लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या बैठका घेण्याची वेळ पक्षावर आली होती, तर एका गटाने नाहक कटकट नको, या उद्देशातून पक्षाच्या होर्डिंग-बॅनरवर एकमेकांचे छायाचित्र न छापण्याची भूमिका घेतली. कार्यक्रमाचा जो आयोजक असेल, त्याने त्यांच्यापुरते छायाचित्र छापावेत, असा अलिखित नियम घालून घेतल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत झालेल्या राष्टÑवादीच्या बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुंबई येथे ७ व ८ जून रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना प्रामुख्याने बोलाविण्यात आले असून, पक्ष संघटना हाच मुद्दा ऐरणीवर राहणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण