शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काँग्रेसच्या नेत्यांनाे, आंदाेलनात ‘कायकर्ते’ आणा! पदाधिकाऱ्यांना दिले टार्गेट; निष्क्रिय नेत्यांवर हाेणार कारवाई

By राजेश शेगोकार | Updated: March 28, 2023 18:07 IST

काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलनात कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. 

अकाेला : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी किंवा प्रदेशकडून नियाेजित केलेल्या आंदाेलनात, जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या आंदाेलनात अनेक पदाधिकारी सहभागी हाेत नाहीत. याची गंभीर दखल घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या निर्देशावरून आता पदाधिकाऱ्यांना पदानुसार आंदाेलनात कार्यकर्ते आणण्याचे ‘टार्गेट’ ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जे पदाधिकारी कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट पूर्ण करणार नाहीत, त्यांची माहिती जिल्हाध्यक्षांनी कळविल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन व प्रशासन सरचिटणीस देवानंद पवार यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार २८ मार्च राेजी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून याबाबत सूचित केले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, प्रश्न तसेच राजकीय मुद्द्यांवर विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण अथवा सत्याग्रह असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले जात असतात. पक्षीय कार्यक्रम असो वा जनतेच्या समस्यांसाठी घेतलेला कार्यक्रम असो, जिल्हास्तरावर सर्वच सन्माननीय पक्ष पदाधिकारी यांनी स्वतः सहभागी होत आपल्याबरोबर इतर कार्यकर्ते यांचा सहभागही जास्तीत जास्त संख्येने करणे अपेक्षित आहे.

 परंतु, अनेक पदाधिकारी अशा पद्धतीच्या आंदोलन, मोर्चात सहभागी होत नाहीत, असे निर्दशनास आले आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या सर्वच कार्यक्रमांत पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देण्यासाठी पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याची सूचनाही जिल्हाध्यक्षांना केली आहे.

असे आणावे कार्यकर्ते -

  •  प्रदेश पदाधिकारी किमान ४० कार्यकर्ते
  • जिल्हा पदाधिकारी २० कार्यकर्ते
  •  ब्लॉक स्तर पदाधिकारी १० कार्यकर्ते 

 

टॅग्स :AkolaअकोलाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस